Breaking News

खोपोलीत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

खालापूर : प्रतिनिधी – खोपोली शहरात पुन्हा नागरिकांनीच 18 ते 20 एप्रिल असे तीन दिवस कडक जनता कर्फ्यू जाहीर करून त्याचे पालन करण्यास सुरुवात केली. कर्फ्यूमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत.

केंद्र शासन व राज्य शासनाने 21 दिवसांचा 14 एप्रिलपर्यंत लोकडाऊन केला असताना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र शासनाने या आजाराची साखळी तोडण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. खालापूर तालुका व खोपोली शहराच्या बाजूलाच असणार्‍या पनवेल व उरण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच असल्याने खोपोलीत पुन्हा नागरिकांनीच 18 ते 20 तीन दिवस पूर्णता लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याचे दिसून आले.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply