मोहोपाडा : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वासांबे (मोहोपाडा), वावेघर आणि चांभार्ली ग्रामपंचायतींनी 24 व 25 एप्रिल रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.या काळात मेडिकल वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. वाहतूकही बंद असेल. त्यामुळे कुणीही घरातून बाहेर पडू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तिन्ही ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper