Breaking News

विवाह सोहळ्याचा खर्च वाचवून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोरोना पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यावरही बंधन आल्याने गर्दी न करता ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रसायनीनजीकच्या कसळखंड येथील धन्वंती घरत आणि रोहिदास जुनघरे यांचा विवाह सोहळा अगदी साध्या पध्दतीने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन करण्यात आला. या वळी विवाह सोहळ्याचा खर्च वाचवून वधुवरांच्या हस्ते आसपासच्या परिसरातील आदिवासी गोरगरीब बांधवांना कपडे व महिनाभर पुरेल इतके धान्यासह किराणा सामान वाटप करण्यात आले. लग्नाला होणारा अनाठायी खर्च न करता तो गोरगरीबांना मदतीसाठी खर्च करा, त्यांचे आशीर्वाद मिळेल असे वर रोहिदास जुनघरे व वधु धन्वंती घरत यांनी बोलताना सांगितले. लॉकडाऊन काळात विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन  वधुवरांनी केले. यापुढे विवाह सोहळे थाटामाटात न करता अनाठायी खर्च करू नये अशी मागणी या वधुवरांनी करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply