मुंबई : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. अखेर काँग्रेस एकच जागा लढवण्यास राजी झाल्याने महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार असून, यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. संख्याबळ नसतानाही दोन जागा लढवण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. कोरोनाच्या संकटकाळात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अन्य पक्ष प्रयत्नशील असताना काँग्रेसने परस्पर दोन उमेदवार जाहीर केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले होते. अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर काँग्रेसने एका जागेवरून माघार घेतली. त्यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे.
Check Also
अमृत महोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मल्हार नेटवर्क प्रा. …
RamPrahar – The Panvel Daily Paper