नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 12) राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्यांवर निशाणा साधला. मुद्रा योजनेंतर्गत 27 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कर्जे देण्यात आली. ही कर्जे कोणी घेतली जावयाने का, असे म्हणत सीतारामन यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. या वेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत जावई हा शब्द काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही. जावई प्रत्येक घरात असतो, परंतु काँग्रेससाठी जावई (दामाद) हे एक विशेषनाम आहे, असे म्हणत टोला लगावला. राज्यसभेतील चर्चेदरम्यान निर्मला सीतारामन यांनी डिजिटल ट्रान्झॅक्शनवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नालाही उत्तर दिले.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper