हुगळी : पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि. 22) हुगळी येथील एका सभेत बोलताना तुमचा उत्साह आणि ऊर्जा कोलकाताहून दिल्लीपर्यंत एक मोठा संदेश देत आहे. आता पश्चिम बंगालने परिवर्तनासाठी मन बनवले आहे, तसेच कमळ पश्चिम बंगालमध्ये अस्सल परिवर्तन आणणार असल्याचे प्रतिपादन केले. आम्ही असा बंगाल बनवू, जो रोजगार व स्वयंरोजगाराने युक्त असेल. जिथे सर्वांचा विकास होईल. माँ, माटी आणि मानुषच्या गप्पा करणारे लोकबंगालच्या विकासासमोर भिंत बनून उभे राहिले आहेत, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तृणमूल सरकारवर निशाणा साधला. बंगालमध्ये कमळ फुलणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper