नवी दिल्ली ः मान्सूनचे आगमन अंदमान निकोबार बेटावर झाले आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून लवकर हजेरी लावेल हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. यापूर्वी केरळमध्ये मान्सून वेळेआधी येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता अंदमान निकोबार बेटांवर मान्सून सरी बसल्याने 31 मेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटतील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे अंदमानमध्ये सरी कोसळल्यानंतर सात दिवसांत मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहचतो. यंदा सरासरीच्या 98 टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. या संदर्भातील परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper