महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यात गुरुवारी (दि. 16) गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे कडधान्य आणि आंबा उत्पादनाचे तसेच वीट उत्पादकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यात विविध भागांत अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महाडमध्ये ढग दाटून आले आणि गारांचा पाऊस पडला. यामुळे कामावरून सुटलेल्या कामगारांना आणि रस्त्यावरील वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेत विक्रीस बसलेल्या विक्रेत्यांचेदेखील हाल झाले.
महाड तालुक्यात किल्ले रायगड परिसर, महाड शहर, दासगाव खाडी पट्टा आदी भागात पावसाच्या सरी तसेच गारा पडून जनजीवन विस्कळीत झाले. या अवकाळी पावसामुळे आंबा व्यावसायिक, शेतकरी तसेच वीटभट्टी व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
Check Also
सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी
तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …
RamPrahar – The Panvel Daily Paper