Breaking News

उद्धर येथे तीन घरे जमीनदोस्त

पाली : प्रतिनिधी

मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यात उद्धर आदिवासी वाडीतील नवशा वाघमारे, संजय नारायण वाघमारे आणि भागूनाथ जाधव यांची तीन घरे जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवाने या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे भिजून मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून त्वरित पंचनामा होऊन या कुटुंबांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply