गडचिरोली ः प्रतिनिधी
गडचिरोलीत एटापल्लीमधील पेदी-कोटमी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी 13 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिटकडून ही कारवाई करण्यात आली.
सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्षली तेंदू कंत्राटदारांकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बैठक सुरू होती. त्या वेळी कारवाई करण्यात आली.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार जंगलात नक्षलविरोधी अभियान अंतर्गत पोलिसांची तुकडी नक्षलवादी असलेल्या ठिकाणी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत 13 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत याची नेमकी माहिती अभियान संपल्यावर सांगता येईल.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper