Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वोत्तम विद्वान -संजीव नाईक

नवी मुंबई ः प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वोत्तम विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच आपण भारतीय बाबासाहेब यांना युगपुरुष म्हणून संबोधित करतो. समता, स्वतंत्र आणि बंधुत्व यावर आधारित त्यांनी लिहलेल्या आदर्श राज्यघटनेमुळेच आजही आपण एकसंघ आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार संजीव नाईक यांनी नेरुळमध्ये बोलताना सांगितले. नेरुळ सेक्टर 6 सारसोले गावमधील पंचशील सामाजिक संस्थेच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भीम अनुयायांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. या उत्सवाला भाजप नेते माजी खासदार संजीव नाईक, स्थानिक माजी नगरसेवक सुरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी नाईक बोलत होते. प्रारंभी, पंचशील ध्वजारोहण, धम्मपूजा करण्यात आली. प्रसिद्ध गायक भीमराव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या जयंतीमहोत्सवात आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply