Breaking News

पावसाचे पुनरागमन

रायगड जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागांत बुधवारी (दि. 24) पर्जन्यवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, सुधागड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.

मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सकाळी दोन तास त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर धुवाँधार पाऊस बरसायला सुरुवात झाली. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. रस्त्यावर फूटभर पाणी होते. त्यातून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती.

पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली होती, पेण ते वडखळ या सहा किलोमीटरच्या प्रवासाला तब्बल दोन ते अडीच तास जात होते.

अंबा, कुंडलिका नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. गेली आठ दिवस पाऊस नसल्याने शेतातील पाणी कमी झाले होते, परंतु आता जोरदार पाऊस झाल्याने खोळंबलेल्या शेतीच्या कामांना पुन्हा वेग आला आहे.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply