Breaking News

रोहितसोबत मतभेद नाहीत : विराट

मुंबई : प्रतिनिधी

अष्टपैलू खेळाडू, उपकर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत बेबनाव असल्याच्या बातम्यांचे कर्णधार विराट कोहलीने सोमवारी (दि. 29) स्वत: खंडन केले. आमच्यात बेबनाव असता, तर आम्ही सेमीफायनलपर्यंतचा पल्ला गाठलाच नसता, असे सांगतानाच या सर्व बातम्या हास्यास्पद असल्याचे विराटने सांगितले. विराटच्या या म्हणण्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही समर्थन केले.

वेस्ट इंडिज दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वीच विराटने पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियात सारे काही अलबेल असल्याचे सांगितले. रोहित व माझ्यात बेबनाव असल्याच्या बातम्या कुठून आल्या हे माहीत नसल्याचेही तो म्हणाला.

Check Also

स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्व. …

Leave a Reply