Breaking News

पाकसमवेत खेळण्यासाठी दबाव

मुंबई ः प्रतिनिधी

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये खेळू नये, अशी देशवासीयांची भावना होती. त्यानंतर बीसीसीआयनेदेखील आम्ही पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये सरकारच्या परवानगीशिवाय खेळू शकत नाही, असे आयसीसीला कळवले होते, पण आता आयसीसीने बीसीसीआयला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

  आयसीसी कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही. कारण हे निर्णय सरकार घेऊ शकते. हे माहिती असतानाही बीसीसीआयने आम्हाला याबाबत विचारणा केली होती, पण हा निर्णय घेणे आमच्या हातामध्ये नाही.

 पाकिस्तानातून दहशतवाद्यांना मिळत असलेले सहकार्य आणि त्यामुळे भारतावर सतत होणारे हल्ले यामुळे शेजारील राष्ट्राविरोधात देशात संतापाचे वातावरण आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्या संतापात अधिक भर पडली. त्यामुळे पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची भाषा देशवासीय करीत आहेत. पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका. मग ते राजकीय असो, आर्थिक असो किंवा खेळाच्या मैदानावरील असो. पाकला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना देशवासीयांत आहे. त्यामुळेच इंग्लंडमध्ये होणार्‍या वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) पाकविरुद्ध सामन्याबद्दल मोठे विधान केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर तेथे खेळण्याची गरज नाही, अशी मागणी भारतात जोर धरत आहे. त्यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, वर्ल्डकप स्पर्धा नजीक आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. या प्रकरणात आयसीसी काहीच करू शकत नाही. भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये असे सरकारला वाटत असेल तर आम्ही सामन्यावर बहिष्कार घालू.

-‘पाकवर बहिष्कार टाकणे सोपे नाही’

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय क्रिकेट संघाने आगामी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी होत आहे. भारताच्या काही माजी खेळाडूंनीही याला समर्थन दिले आहे. 14 फेब्रुवारीला झालेल्या  भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानवर वर्ल्डकप स्पर्धेत बंदी घालावी, अशी मागणी  आयसीसी  केल्याची माहिती सूत्रांनी दिली, मात्र भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने यावर वेगळे मत व्यक्त केले आहे. असा बहिष्कार घालणे अशक्य असल्याचे गांगुलीचे म्हणणे आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply