नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना रविवारी (दि. 6) अभिवादन केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांना जो भारत अपेक्षित होता तो निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून म्हटले आहे.
लक्षावधी नागरिकांच्या आयुष्यात जो प्रगतीचा नंदादीप तेवला आहे त्यामागे बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आहे. त्याचे सर्वांनी अनुकरण करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.
Check Also
वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!
वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …
RamPrahar – The Panvel Daily Paper