Breaking News

घरातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह असताना मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन कसे काय केले?

भाजपचा सवाल; खुलासा करण्याची मागणी

मुंबई ः प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. घरातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला, असा सवाल भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
मुंबईच्या महौपार किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचे म्हटले आहे. आरोग्य यंत्रणांवरील बोजा कमी करण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महापौरांच्या वक्तव्यारून मुख्यमंत्र्यावरच निशाणा साधला आहे.
आमदार भातखळकर यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा.
बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असूनही मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली होती.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply