Breaking News

मोदी सरकारकडून प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम -आमदार प्रशांत ठाकूर; असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी केंद्राचे पनवेलमध्ये उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत महत्त्वाकांशी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या धोरणांतर्गत अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम मोदी सरकारमुळे होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 14) येथे केले. मोदी सरकारची ई-श्रम कार्ड ही आणखी एक महत्त्वपूर्ण योजना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत राबवली जात आहे. त्यानुसार पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी या उपक्रमाबद्दल युवा मोर्चा व आत्मनिर्भर टीमचे कौतुक केले. त्याचबरोबर या उपक्रमातून असंघटित कामगारांना मोठी ताकद मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. या कार्यक्रमास युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, आत्मनिर्भर भारतचे प्रदेश संयोजक हर्षल विभांडीक, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, आत्मनिर्भर भारत कोकण विभाग संयोजक विनय सावंत, सहसंयोजक अ‍ॅड. राखी बरोत, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक व शहर सरचिटणीस नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेविका रूचिता लोंढे, कामगार नेते जितेंद्र घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, शहराध्यक्ष रोहित जगताप, आत्मनिर्भर भारतचे जिल्हा संयोजक आकाश भाटी, भाजप शहर सरचिटणीस अमरिश मोकल, चंद्रकांत मंजुळे, राजेंद्र कोळी, मधुकर उरणकर यांच्यासह कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, 130 कोटींपेक्षा जास्त जनता आपल्या देशात आहे. यातील प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काम करीत आहे. पूर्वीच्या सरकारला निवडणुका आल्यावर जनतेची आठवण यायची, परंतु मोदी सरकार कुठलेही राजकारण न करता अहोरात्र जनतेच्या सेवेत गुंतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जीवन सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी गरिबांचा विचार करून अनेक लोकोपयोगी योजना अमलात आणून यशस्वी केल्या. कोरोनाचे महासंकट जगावर आले असताना देशाला संकटाला सामोरे जाण्याची ताकद आणि विश्वास त्यांनी देत सर्वतोपरी मदतही केली. केंद्र सरकारने नागरिकांच्या हितासाठी वेळोवेळी चांगले निर्णय घेतले. दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीने मात्र जनतेच्या पदरी फक्त निराशा दिली. महाविकास आघाडी सरकार प्रत्येक स्तरावर अपयशी ठरले आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विविध योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहे. पूर्वीच्या सरकारने देशात फक्त हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले, तर मोदी सरकारमुळे देशात विकासपर्व सुरू झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गोरगरिबांना मदत करण्याचे उपक्रम सातत्याने आयोजित करून त्यांची सेवा केली जात आहे.

-विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, महाराष्ट्र

असंघटित कामगार देशाची ताकद आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. हेच उद्दिष्ट ठेवून ई-श्रम कार्ड योजना अमलात आणण्यात आली असून या माध्यमातून विमा, शिक्षण, मुलींचे विवाह अशा अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे. -हर्षल विभांडीक, संयोजक, महाराष्ट्र प्रदेश आत्मनिर्भर भारत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply