Breaking News

आरपीएल नॉकआउट स्पर्धा उत्साहात; आता वेध मुख्य थराराचे

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड प्रीमियर लीग टी-20 नॉकआउट क्रिकेट स्पर्धा खारघर येथील इमामपुरीच्या मैदानावर उत्साहात झाली. रायगड एच संघ विरुद्ध रायगड के संघ असा अंतिम सामना रंगला. त्यात रायगड एच संघाने बाजी मारत विजेेतेपद पटकाविले. आता मुख्य स्पर्धा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. आरपीएलच्या लिलाव प्रक्रियेत ज्या खेळाडूंना स्थान मिळू शकले नाही अशा खेळाडूंसाठी आयोजकांनी बाद पद्धतीची स्पर्धा आयोजित केली होती. एकूण 16 संघांचा यामध्ये समावेश होता. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक खेळाडूला टी-शर्ट व अल्पोपहाराची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती. जवळजवळ दीड वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर खेळाडूंना क्रिकेटचा आस्वाद घ्यायला मिळाल्याचा आनंद प्रत्येकाने मनोसक्त घेतला. नॉकआऊट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या 16 खेळाडूंना आरपीएलच्या मूळ स्पर्धेत थेट वाईल्ड कार्ड एण्ट्री देण्यात येणार आहे. नॉकआऊट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक, उपाध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, खजिनदार कौस्तुभ जोशी, कार्याध्यक्ष जितेंद्र नाईक, सहसचिव संदीप जोशी, प्रदीप खलाटे, चंद्रकांत म्हात्रे, प्रीतम पाटील, सुनील सरगर, कुणाल पाटील, महेंद्र भाटिकरे उपस्थित होते. नॉकआऊट स्पर्धेनंतर आता संपूर्ण रायगड जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत ते आरपीएलच्या थराराचे.

Check Also

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत …

Leave a Reply