
लंडन ः वृत्तसंस्था
आयसीसी विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताचा संघाला जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी आत्महत्या करण्याचे ठरवले होते. स्वत: आर्थर यांनीच ही कबुली दिली आहे. 16 जून रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात पाकचा 89 धावांनी पराभव झाला. यानंतर पाक संघाला प्रसारमाध्यमे, प्रशंसक, माजी क्रिकेटपटूंकडून मोठी टीका सहन करावी लागली होती. गेल्या रविवारी आर्थर यांनी आत्महत्येचा विचार केल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. आर्थर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, ’हा पराभव एकाच सामन्यातील होता. हे सर्व पटापट झाले. तुम्ही एक सामना जिंकता आणि एक हारता. ही विश्वचषक स्पर्धा आहे. प्रसारमाध्यमांकडून होणारी टीका, लोकांच्या अपेक्षा आणि पुन्हा आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न आम्ही खूप काही सहन केले. या पराभवानंतर पाकिस्तानने पुढच्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वत:चे स्थान राखले. या पुढील सर्ल सामन्यांमध्ये पाकिस्तान संघ उत्तम कामगिरी करील, असा विश्वासही आर्थर यांनी व्यक्त केला. हा केवळ एकच असा सामना होता, या पुढे आपल्याला चांगलीच कामगिरी करायची आहे, असे आम्ही खेळाडूंना सतत सांगत आहोत, असेही आर्थर म्हणाले. या विश्वचषकात आतापर्यंत 6 सामने खेळलेल्या पाकिस्तानच्या नावापुढे 5 गुण आहेत. पाक सध्या गुणफलकावर सातव्या स्थानी आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकला उर्वरित सर्व 3 सामने जिंकावे लागणार आहेत. पाकचा पुढील मुकाबला बुधवारी न्यूझीलंडशी होत आहे. त्यानंतर पाकिस्तान शनिवारी अफगाणिस्तान आणि 5 जुलैला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper