नांदेड : अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते. ती वाटणारच, कारण त्यांचे बुरे दिन सुरू झाले. या सरकारने योजनांतील दलालीही बंद केली आहे. त्यामुळे आता कुणीही तुम्हाला विचारत नाही. हे तुमच्याच पापाचे भोग असून, पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्नेही पाहू नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. नांदेडमधीतील भक्ती लॉन्स येथे आयोजित भाजपच्या बुथ कमिटी मेळाव्यात ते बोलत होते. पुलवामा येथील हल्ल्यानंतर 48 तासांच्या आत यातील आंतकवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. सेनेला खुली सुट दिल्यानंतर काय होते, हे सर्जिकल स्ट्राईकमधून जगाने पाहिले. आता पुन्हा एकदा सेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोकळीक दिली असून, हा नवा भारत आहे, असा संदेश जगात गेला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper