मुंबई ः राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती तसेच रुग्णालयांतील बेड, इंजेक्शन व ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 12) मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान राज्य सरकारला धारेवर धरले. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘स्वत:च स्वत:च्या कौतुकाची टिमकी वाजवत त्यातच मश्गूल असणार्या राज्य सरकारचे वाभाडे आज न्यायालयाने काढले. जनहितापेक्षा स्वकौतुकासह बेछूट व बेजबाबदार विधान करण्याची सवय असलेल्या राज्य सरकारने तिथेही न्यायालयाची दिशाभूल करीत वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला, पण थेट फोनच लावायला सांगत तोही उघडा पडला. या खरडपट्टीनंतर राज्य सरकार भानावर येऊन काही जनहिताचे निर्णय घेईल का? हा खरा प्रश्न आहे,’ असे भाजप प्रवक्ते उपाध्ये यांनी म्हटले आहे.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper