मुंबई ः राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती तसेच रुग्णालयांतील बेड, इंजेक्शन व ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 12) मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान राज्य सरकारला धारेवर धरले. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘स्वत:च स्वत:च्या कौतुकाची टिमकी वाजवत त्यातच मश्गूल असणार्या राज्य सरकारचे वाभाडे आज न्यायालयाने काढले. जनहितापेक्षा स्वकौतुकासह बेछूट व बेजबाबदार विधान करण्याची सवय असलेल्या राज्य सरकारने तिथेही न्यायालयाची दिशाभूल करीत वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला, पण थेट फोनच लावायला सांगत तोही उघडा पडला. या खरडपट्टीनंतर राज्य सरकार भानावर येऊन काही जनहिताचे निर्णय घेईल का? हा खरा प्रश्न आहे,’ असे भाजप प्रवक्ते उपाध्ये यांनी म्हटले आहे.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper