Breaking News

तिहेरी अपघातात मुंबईतील सहा जणांचा मृत्यू

मुंबई ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एका बाइकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणार्‍या भरधाव कारसमोर बाइकस्वार आल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. आकाश चव्हाण (42-बोरिवली), नवनाथ नवले (25- मोखाडा), भागवत जाधव (50 -पनवेल), प्रतिमा शहा (70 -कांदिवली), राकेश शहा (50 -कांदिवली) आणि दिलीप चंदानी (30 -पनवेल) हे सहा जण मृत, तर दोन जण जखमी झाले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply