नवी दिल्ली ः पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकमधील बालाकोटवर चढविलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पाकिस्तानने हवाई हद्द सील केली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान भारतीय हद्दीत आल्याने हवाई दल सतर्क झाले आहे. सुखोई लढाऊ विमानांनी या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले. हे विमान जॉर्जियाचे असून, कराचीहून या विमानाने उड्डाण केले होते.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper