नवी दिल्ली ः पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकमधील बालाकोटवर चढविलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पाकिस्तानने हवाई हद्द सील केली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान भारतीय हद्दीत आल्याने हवाई दल सतर्क झाले आहे. सुखोई लढाऊ विमानांनी या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले. हे विमान जॉर्जियाचे असून, कराचीहून या विमानाने उड्डाण केले होते.
Check Also
खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …
RamPrahar – The Panvel Daily Paper