Breaking News

रणजी करंडक : सौराष्ट्र अंतिम फेरीत

राजकोट : वृत्तसंस्था

जयदेव उनाडकच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत गुजरातवर 92 धावांनी मात करीत सौराष्ट्राने अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. अंतिम फेरीत सौराष्ट्राची गाठ पश्चिम बंगालशी पडणार आहे.

सौराष्ट्राने पहिल्या डावात 304 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरादाखल गुजरातचा संघ पहिल्या डावात 252 धावांपर्यंतच मजल मारू शकला. दुसर्‍या डावात सौराष्ट्राची सुरुवातही खराब झाली होती. 15 धावांमध्ये निम्मा संघ माघारी परतला असताना मधल्या फळीत चेतन सकारियाच्या 45 धावा, अर्पित वसवडाचे शतक आणि चिराग जानीने अर्धशतक झळकावत सौराष्ट्राला 274 धावांपर्यंत मजल मारून दिली. दुसर्‍या डावात गुजरातकडून चिंतन गजाने सात बळी घेतले. गुजरातला विजयासाठी 327 धावांचे आव्हान देण्यात आले होते.

दुसर्‍या डावात गुजरातची पुरती घसरगुंडी उडाली. कर्णधार पार्थिव पटेल आणि चिराग गांधी यांनी अनुक्रमे 93 आणि 96 धावांची खेळी करीत झुंज दिली, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने सात बळी घेतले.

-कर्णधार जयदेव उनाडकटचा विक्रम

सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने या कामगिरीदरम्यान रणजी करंडकात एका हंगामात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावे जमा केला. या हंगामात उनाडकटच्या नावावर 65 बळी जमा झाले आहेत. 1998-99 साली कर्नाटकच्या दोड्डा गणेश यांनी एका हंगामात 62 बळी घेतले होते. यानंतर तब्बल 21 वर्षांनी उनाडकटने हा विक्रम आपल्या नावे जमा केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply