नवी दिल्ली : देशभरातील कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 हल्ल्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जाती, पंथ, भाषा किंवा सीमा यापैकी काहीही पाहत नाही. त्यामुळे आपला प्रतिसाद आणि आचरण हे ऐक्य-बंधूता यांना प्राधान्य देणारे असायला हवे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ’लिंक्डइन’वरून एक लेख प्रसिद्ध केला आहे. कोरोना संकटानंतर जगाला एका नव्या बिझनेस मॉडलची गरज असल्याची जाणीव झालीय. तरुणांची अखंड ऊर्जा असणारा भारत कोविड-19 नंतर जगाला एक नवीन मॉडेल देईल, असे या लेखात पंतप्रधान मोदींनी म्हटलेय. भारत जगाला एक नवी कार्य संस्कृती देऊ शकतो कारण हाच देश आपल्या नवोन्मेषी विचारांप्रती उत्साहासाठी प्रसिद्ध आहे, असेही यात पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
Check Also
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन
विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …
RamPrahar – The Panvel Daily Paper