Breaking News

ट्रेन्ड इज फ्रेंन्ड

बाजाराचा खरा रंग ओळखण्यापेक्षाही महत्त्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे बाजाराचा बदललेला रंग ओळखणे आणि हे काहीशा सोप्या अभ्यासाने साध्य होऊ शकते.

मागील दोन महिन्यात बाजाराने चांगलाच रंग दाखवला आहे आणि हा रंग ओळखण्यासाठी आपल्यापैकी बहुतेक सर्व अगदी जिवाचे रान करताना आढळतात. परंतु अगदी नगण्य लोकांनाच यात यश मिळताना दिसते आणि बहुधा असे यश हे चुकून लागलेल्या मटक्यासारखे असते. बाजाराचा अगदी अचूक रंग ओळखण्यात जरी आपण यशस्वी ठरलो नाही तरी काही अशा गोष्टी आहेत की, ज्यामुळे आपल्याला बाजार खूप महाग झालाय किंवा स्वस्त झालाय हे कळू शकते. 2021 ऑक्टोबरमध्ये असणारा निफ्टीचा पी/ई रेश्यो हा 28वरून सध्या 20च्या आत आलेला आहे तर व्यापक निफ्टी 500 निर्देशांकाचा पी/ई देखील 29 वरून सध्या 20 आहे. म्हणजेच बाजार एकंदरीत तुलनेने स्वस्त झालाय. तेजीच्या बाजारात अनेक शेअर्सच्या किंमती आज बर्‍याच प्रमाणात खाली आलेल्या आहेत. तेजीमध्ये चढाओढ करून शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार सध्या मात्र कमी भावात चांगले शेअर्स घ्यावयास धजावत नाहीत.

आता या झाल्या पुस्तकी गोष्टी. परंतु बाजाराचा खरा रंग ओळखण्यापेक्षाही महत्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे बाजाराचा बदललेला रंग ओळखणे आणि हे काहीशा सोप्या अभ्यासाने साध्य होऊ शकते. त्यासाठी सर्वसाधारणपणे बाजाराचा कल म्हणजे ट्रेंड विचारात घेता येऊ शकतो. ट्रेंड इस युवर फ्रेंड असे मार्केटमध्ये उगाचच म्हटले जात नाही. आता कल म्हणजे आला टेक्नीकल म्हणजेच तांत्रिक भाग. आता अगदी बेसिक प्रश्न स्वतःलाच विचारुया की जर फक्त एखाद्या कंपनीचे मूलभूत विश्लेषण करून त्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे ठरवले तर ते कोणत्या भावात घ्यायचे म्हणजे योग्य भाव कोणता आणि दुसरे म्हणजे रोज जर कंपनीबाबतच्या मूलभूत गोष्टी म्हणजेच फंडामेंटल्स बदलत नसतील तर प्रत्येक सेकंदागणिक त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या भावांत चढ-उतार का होताना दिसतात? याचे उत्तर एकाच ते म्हणजे कोणत्याही गोष्टीची किंमत ही त्या गोष्टीसाठीचा मागणी व पुरवठा निश्चित करत असतो. यासाठी इथे तांत्रिक विश्लेषणास महत्त्व प्राप्त होते. आजपर्यंत आपण याबाबत अनेक बाबी शिकलेल्या आहेतच परंतु आज आपण केवळ ’कल’ याच गोष्टीबाबत पाहुया आणि सध्याच्या मार्केटमध्ये याद्वारे अनेकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू..

काही गृहीतके – 1) चरीज्ञशीं वळीर्लेीपीीं र्शींशीूींहळपस (बाजारास सर्व गोष्टी अवगत असतात), नियम 2) खीं ीशषश्रशलीं ळपीें ींहश िीळलशी (कोणत्याही कंपनीच्या प्रत्येक भावातील हालचाल ही चार्टवर उमटली जातेच आणि त्या भावात त्या वेळची प्रत्येक गोष्ट समाविष्ट झालेली असते), नियम 3) झीळलश र्ोींशी ळप ीींशपव (तक्त्यावर भाव हे एका दिशेतच मार्गक्रमण करतात). पहिले दोन नियम हे कळावयास सोपे आहेत परंतु तिसरा नियम समजायला अवघड आहे. आता प्रश्न आहे की भाव हे एका विशिष्ठ दिशेतच मार्गक्रमण का व कसे करतात? याचे उत्तर समजावून घेण्याचा प्रयत्न करुया.

बाजारातील नियामकांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही संवेदनशील माहिती ही हळूहळू बाजारामध्ये फुटतेच. सर्वप्रथम,ती फक्त अगदी आतील गोटापर्यंत मर्यादित असते, मग त्या गोटातील खास लोकांच्या जवळील मंडळीपर्यंत नंतर विश्लेषक आणि मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत आणि शेवटी सामान्य जनतेपर्यंत पोहोचत असते. या प्रसारणात काही मिनिटांपासून ते दिवसांपर्यंतचा वेळ लागतो. अनेक वेळा अशा बातम्या बाजारात येईपर्यंत त्यासंबंधीत कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत हालचाल होऊन गेलेली असते. उदा. एखाद्या कंपनीच्या बाबतीतील विशेष घटना अथवा आगामी काळात जाहीर होणारे निर्णय हे त्या कंपनीच्या मालकांव्यतिरिक्त संचालक मंडळास, प्रवक्त्यांस नक्कीच माहिती असतात. जर ती माहिती कंपनीसाठी सकारात्मक असेल तर अशा व्यक्तींकडून किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून अशा कंपनीच्या शेअर्सची जोमाने खरेदी होते. नंतर जसजशी ही माहिती हळूहळू बाहेर येते तसतशी वर दिल्याप्रमाणे इतरांकडूनही खरेदी होऊ शकते. आता समजा अशा घडामोडींच्या आधी एखाद्या कंपनीचा भाव 100रु. असेल तर सर्वप्रथम आतल्या गोटातील मंडळी म्हणजे कंपनीचे मालक, संचालक, प्रवर्तक, त्यांचे नातेवाईक, इ. लोक अचानक या कंपनीच्या शेअर्सच्या भावांवर तुटून पडतात व पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यानं हे भाव 101-102-103-110 पर्यंत देखील वाढतात. तोपर्यंत, नंतरच्या गटातील लोकांना याची जाणीव होते व ते भाव खाली यायची वाट न पाहता 110 च्या भावात उड्या मारतात व भाव 114-115 पर्यंत घेऊन जातात. आता पहिल्या गोटातील किरकोळ असलेल्यांना साधारणपणे 14-15 टक्के नफा मिळत असल्याने त्यातील काही नफावसुली करतात व भाव पुन्हा 107-110 पर्यंत खाली येतात. परंतु ते तेजीच्या सुरुवातीच्या पायथ्याशी कधीच येत नाहीत याचे कारण म्हणजे ज्यांची सुरुवातीस खरेदी राहून गेलेली असते ते लोक या वाढून पडलेल्या भावात संधी साधतात व भाव पुन्हा 115पर्यंत पोहोचतात. त्यामुळे कल-दिशेसाठी आता 100-107 -110-115 असे उच्चांक स्थापन झालेले दिसतात आणि यालाच आलेखावर ट्रेंड म्हटले जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे देता येईल. 22 फेब्रुवारी 2017 रोजी रिलायन्सने जियो बद्दलची घोषणा केली आणि रिलायन्सच्या शेअरचा भाव त्याच दिवशीसुमारे 11 टक्क्यांनी वाढून मागील आठ वर्षांतील उच्चांकाजवळ पोहोचला. परंतु बारकाईने पाहिल्यास आता लक्षात येईल की याची मुहूर्तमेढ नोव्हेंबर 2016पासूनच झालेली दिसते. रिलायन्सचा भाव रु. 465 वरून हळूहळू रु.548 झाला पुन्हा 507 रुपयांपर्यंत खाली येऊन, 21 फेब्रुवारी म्हणजे अधिकृत घोषणेच्या आदल्या दिवशी पुन्हा 545 रु. झाला व 22 फेब्रुवारीचा त्याचा बंद भाव होता 603 रुपये.

बाजारात प्रमुख दोन प्रकारचेट्रेंड असतात, चढता कलवउतरता कल. ीळवशुरूी म्हणजे समांतर चाल (यामध्ये कोणताही कल नसल्याने मी याला कल म्हणत नाही. जेव्हा कोणताही भाव हा नवीन उच्चांक नोंदवत वरील बाजूने मार्गक्रमण करत असतो व त्या नवीन उच्चांकांदरम्यान येणार्‍या दुय्यम ट्रेंड (करेक्शन) मधील निचांक देखील चढ्या भावातील असतात. अगदी याउलट प्रकार हा उतरत्या ट्रेंडमध्ये आढळतो. यामध्ये भाव हे नवीन निचांक नोंदवताना दिसतात तर दरम्यानचे दुय्यम ट्रेंड (पुलबॅक) हे देखील आधीच्या उच्चांकापेक्षा कमी भावाचे असतात. समांतर चाल किंवा ीळवशुरूी म्हणजेच धड अपट्रेंड नाही किंवा डाऊनट्रेंड नाही तर दोन उच्चांक व दोन नीचांकांदरम्यानची समांतर चाल. अपट्रेंड व डाऊनट्रेंड मध्ये साधारणपणे तीन अवस्था असतात, संचयन, सहभागिता व वितरण. संचयन म्हणजे जिथं शेअर्स मोठ्या प्रमाणातगोळा केले जातात. सहभागिता म्हणजे पहिल्या गुंतवणूकदारांमागून या प्रवाहात दाखल झालेले, तर वितरण म्हणजे नफेखोरी ज्यावेळेस पहिले गुंतवणूकदार हे मिळालेल्या बातमीचा जोर कमी होऊ लागल्यामुळंआपले शेअर्स विकण्यासाठी इतर नवीन गुंतवणूकदारांच्या / ट्रेडर्सच्या शोधात असतातती अवस्था. उतरत्या ट्रेंडमध्ये ह्याच अवस्था काहीशा उलट क्रमानं असू शकतात. म्हणजे खराब बातमी कळाली असल्यास सर्वप्रथम स्वतःकडे असलेल्या शेअर्सचे वाटप (गळ्यात मारणं), त्यानंतर इतरांची सहभागिता, यात घेणारे, विकणारे व ट्रेडर्स दोन्ही असू शकतात.असो, जर आपणास बाजाराचा नेमका रोख समजू शकलोतर त्याच्या आधारे चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात जोखीम कमी राहू शकते.  बाजारात एकूण तीन कल असू शकतात. एक प्रमुख अथवा मूळ कल जो प्रदीर्घ काळासाठी असू शकतो व जो सहसा बदलत नाही (प्रदीर्घ काळासाठीच्या गुंतवणुकीसाठी), एक मध्यम काळासाठी (साधारणपणे 3-5 वर्षं) व एक तात्पुरता म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेंड, जो काही महिने ते फारतर एखादवर्ष राहू शकतो. दोन उच्चांक अथवा दोन निचांकांच्या आधारे आपण ट्रेंडलाईन (कलरेषा) आखू शकतो. अपट्रेंडमध्ये अशा कलरेषा-आधारपातळीजवळ खरेदी करून आपल्या उद्दिष्टांनुसार नफेखोरी करून पुन्हा गुंतवणूक करावयाची झाल्यास भाव परत कलरेषेजवळ आल्यास गुंतवणूक करता येऊ शकते. जोपर्यंत कल बदलत नाही तोपर्यंतअसे ट्रेंड हे महत्त्वाचे ठरतात. निफ्टीसाठी इ.स. 2003 ते 2008 दरम्यान स्थापन झालेला मूळ कल (ढ1) हा चढता असून त्याची सध्याची आधार पातळी ही साधारणपणे 5700 च्या आसपासयेत आहे. 2008 – 2013 दरम्यान स्थिर झालेला कल (ढ2) हा दीर्घ-मध्यम स्वरूपाचा असून हा देखील चढा आहे वसध्या त्याची आधार पातळी 10400 च्या आसपास आहे,तर करोना संकटानंतर प्रस्थापीत झालेल्या अप-ट्रेंडला (ढ3) नोव्हेंबर 2021 मध्ये कलाटणी मिळून आता मध्यम काळचा ट्रेंड (ढ4) हा उतरता दिसत आहे. ही कल-पातळी छेदण्यासाठी निफ्टीस 18000 च्या वर बंद देणं भाग आहे. तर शॉर्ट टर्म ट्रेंड हा निगेटिव्ह असून 16800-17000 दरम्यान त्यास प्रतिकार संभवतो. त्यामुळं जोपर्यंत हे दोन्ही उतरते कल वरील दिशेनं छेदले जात नाहीत तोपर्यंत तरी तेजीस पुष्टी देण्याचे धाडस होत नाही, कलबदल कधी होणार ते आता पाहुया.

-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply