मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तसेच रायगड, रत्नागिरी, सातार्यात दरड कोसळून दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील तळीये येथे दरड दुर्घटनेत तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा …
Read More »मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी महाडच्या तळीये गावात दरड कोसळून तब्बल 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर शनिवारी (दि. 24) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीयेमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वराती मागून घोडे आहेत, अशी खोचक टीका केली …
Read More »लहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतात सध्या 18 वर्षांवरील वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. आता लहान मुलांच्या कोरोना लसीसंदर्भात एक बातमी समोर आली आहे. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलेय की, देशात लहान मुलांसाठी बनवली जात असलेली भारत बायोटेक कंपनीची कोरोना लस कोवॅक्सिनची चाचणी सध्या सुरू आहे. याचे …
Read More »गोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती
पणजी, पाटणा, बंगळुरू ः वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरून नुकसान झाले आहे. गोव्यात एक हजारांहून अधिक घरांना पुराचा फटका बसला आहे, तर हजारो लोकं बेघर झाली आहेत. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोव्याचे …
Read More »प्रख्यात कवी सतीश काळसेकर यांचे निधन
पेण ः प्रतिनिधी प्रख्यात कवी, संपादक, अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण सिंधुदुर्गमध्येच झाले. पुढे मुंबईत महाविद्यालयीन …
Read More »ऑलिम्पिकमध्ये भारताने उघडले पदकांचे खाते; मीराबाई चानूने जिंकले रौप्यपदक
टोकियो ः वृत्तसंस्था भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात शनिवारी (दि. 24) रौप्यपदक जिंकले. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे पहिले, तर भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील दुसरे ऑलिम्पिक पदक आहे. पहिल्या प्रयत्नात मीराबाईने 84 किलो आणि दुसर्या प्रयत्नात 87 किलो वजन उचलले, मात्र …
Read More »खरेदी आपण गरज म्हणून करतो, की ती आपल्याकडून करून घेतली जाते आहे?
काय खरेदी करावे आणि काय नाही, हे ठरविणारे सर्वस्वी आपण असलो पाहिजे. पण आपल्या खरेदीवर बाह्य गोष्टींचा परिणाम होत असेल, तर सावध होण्याची गरज आहे. अशा कोणत्या बाह्य गोष्टी आपल्या खरेदीवर परिणाम करतात, ते आपण पाहूयात. जर आपण काही ऑनलाईन खरेदी करावयाचे ठरविले आणि सहज त्या वस्तूचा शोध घेतला, तर …
Read More »सायबर गुन्ह्यांचे बळी भारतीयच अधिक का?
भारतात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, असा निष्कर्ष मायक्रोसॉफ्टच्या एका पाहणीत समोर आला आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, पण याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करण्यातही काही शहाणपणा नाही. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात आपल्याला वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते आपण केले तरच या गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात …
Read More »उरण नगर परिषदतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत
उरण : वार्ताहर महाडमधील पूरग्रस्तांसाठी उरण नगर परिषदतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 23) नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, सविन म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका, उरण नगरपरिषदेतील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, उरण शहरातील दानशूर व्यक्ती आदींनी मदत …
Read More »कळंबोलीतील स्मशानभुमी दुरूस्त करा
भाजपच्या राजासेखरन पिल्लई यांची सिडकोकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली वसाहतीतच्या सेक्टर 15 येथील स्मशानभुमीची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे सिडकोने ही स्मशानभुमी दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी भाजप दक्षिण भारतीय सेलचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजासेखरन पिल्लई यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या कळंबोली येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper