Breaking News

महत्वाच्या बातम्या

मयूर शेळके शिव पुरस्काराने सन्मानित

कर्जत : बातमीदार तालुक्यातील चांधई ग्रामस्थ आणि हुतात्मा हिराजी पाटील तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी लहान चांधई येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी  करण्यात आली. त्यावेळी शूरवीर मयूर शेळके यांना शिव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इतिहास संशोधक शिवश्री वसंत कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान चांधई येथे गेल्या 16 वर्षापासून शिवजयंती साजरी …

Read More »

उल्हास नदीतील गाळ काढा; निर्मल जल अभियान कार्यकर्त्यांची मागणी

कर्जत : बातमीदार बारा महिने वाहणार्‍या कर्जतमधील उल्हास नदीला कचरा, गाळ यामुळे विद्रुप स्वरूप आले आहे.  नदीतील गाळ काढण्याची मागणी उल्हास नदी निर्मल जल अभियानाच्या कार्यकर्त्यांनी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या वर्षी उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी कर्जत शहरात घुसले होते. त्यामुळे शहरातील कोतवाल नगर, मुद्रे, …

Read More »

महापुरानंतर महाडमधील पहिला मजला रिकामा

22 जुलै रोजी आलेल्या महापुरामध्ये महाड शहर आणि तालुक्यातील अनेक गावांचे अतोनात नुकसान झाले होते. शहरातील पुराच्या पाण्याची पातळी कधी नव्हे ती जवळपास 20 फुटापर्यंत पोहोचली. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान महाडकर नागरिकांना सहन करावे लागले होते. या महापुरानंतर महाड शहर पुन्हा उभे राहते की, नाही प्रश्न होता. मात्र मोठ्या …

Read More »

चारा घोटाळाप्रकरणी लालूंना पाच वर्षांची शिक्षा

रांची : वृत्तसंस्था बहुचर्चित चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 60 लाखांचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. लालूंविरोधातील हा पाचवा चारा घोटाळा आहे. डोरांडा कोषागारातून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी लालूंना ही …

Read More »

तिसर्‍या आघाडीचा प्रयोग अनेकदा फसलाय

देवेंद्र फडणवीस यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : प्रतिनिधी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांची मुंबईत भेट घेतली आणि भाजपविरोधी तिसर्‍या आघाडीसंदर्भात चर्चा केली. यावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केसीआर-ठाकरे …

Read More »

टीम इंडियामध्ये रोहितपर्व

श्रीलंकेविरुद्ध मायदेशी होणार्‍या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. यामुळे आता टी-20, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही क्रिकेट प्रकारांत रोहित नवा ‘किंग’ असणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम …

Read More »

खांदेश्वर कोकण महोत्सवाची खांदा कॉलनीत रंगत; लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजकांना शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि ओम साई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळाच्या वतीने खांदा कॉलनीत खांदेश्वर कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सेक्टर 8 येथील पोलीस ठाण्यासमोर मैदानावर आयोजित या महोत्सवाला शनिवारी (दि. 19) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. …

Read More »

महाडमध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा

महाड  : प्रतिनिधी येथील क्रिकेट कट्टा ग्रुपच्या वतीने खास महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्टार क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले, तर झेडपी संघ उपविजेता ठरला. महिलांना सांघिक खेळांमधून संधी मिळावी यासाठी क्रिकेट कट्टा ग्रुपची स्थापना करून या ग्रुपच्या वतीने रविवारी (दि. 20) महाडमध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात …

Read More »

राष्ट्रीय एकात्मतेचा विचार वाढल्याशिवाय प्रांतवाद मिटणार नाही : भय्याजी जोशी

अलिबाग ः प्रतिनिधी देशात राष्ट्रीय एकतेचा विचार वाढल्याशिवाय प्रांतवाद मिटणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्रमार्फत दिल्या जाणार्‍या श्री गुरुजी पुरस्काराचे वितरण रविवारी (दि. 20) अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात करण्यात आले. त्या वेळी जोशी बोलत होते. जीवन …

Read More »

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

खासदार संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी उपस्थित राहणार पनवेल ः वार्ताहर सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक पेण येथे रविवारी (दि. 20) झाली. मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात छत्रपती खासदार संभाजीराजे 26 फेबु्रवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणात रायगड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहणार …

Read More »