अलिबाग : प्रतिनिधी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थातच गुढीपाडव्याचा सण शनिवारी (दि. 2) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. जिल्हाभरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दोन वर्षांच्या खंडानंतर मोकळेपणाने हा सण साजरा करता आल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. अलिबाग शहरात शनिवारी सकाळी श्रीराम मंदिर येथून …
Read More »गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय महत्त्वाचा; तो घाईघाईने का घेऊ नये?
रशिया-युक्रेन युद्धामुळे 52 हजार अंशांपर्यत कोसळलेला भारतीय शेअर बाजार गेल्या आठवड्यात साठ हजार अंशांना गवसणी घालतो आहे. याचा अर्थ एका महिन्यात तो आठ हजार अंशांनी वाढला आहे. जेव्हा बाजार पडला तेव्हा ज्यांनी गुंतवणूक घाईघाईने काढून घेतली त्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. गुंतवणुकीतून घाईघाईने बाहेर पडणे कसे नुकसानीत जाऊ शकते …
Read More »भारताच्या अर्थव्यवस्थेला शेतीमाल निर्यातीचा बूस्टर!
सलग तीन वर्षे शेतीमालाचे चांगले उत्पादन घेतलेल्या भारताला त्या मालाच्या निर्यातवाढीची गरज आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे ती संधी भारताला मिळते आहे. या निर्यातीतून शेतकर्यांच्या हातात पैसा येऊन ग्रामीण भागातील मागणी वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीला त्याचा मोठाच हातभार लागणार आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला एक महिना होऊन गेला. युद्धकधी थांबेल हे कोणीच …
Read More »राम प्रहर – अर्थसाक्षर स्पर्धा : 15
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). —– —————- ———— 1. जीएसटीचे सर्वाधिक 1.42 लाख कोटी रुपये संकलन केव्हा झाले आहे? …
Read More »चैत्राची नवपालवी!
यंदाचा गुढी पाडवा हा ‘नेहमीसारखे जगण्याचा उपक्रम’ सुरु करण्यासाठी अगदी आदर्श आहे. कारण गेली दोन वर्षे महाराष्ट्रासाठी एखाद्या काळरात्रीप्रमाणे गेली. दोन वर्षांपूर्वी अशाच एका गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला देशभर लॉकडाऊन करण्याची घोषणा झाली होती. त्यानंतरची दोन वर्षे भयानक संकटाला तोंड देण्यातच गेली. कुठल्याही निर्बंधांशिवाय गुढी पाडवा साजरा करण्याची संधी ही त्यानंतर …
Read More »गुढीपाडवा
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा! कोणत्याही शुभकार्याला या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते. वसंत ऋतुचं आगमन या दिवसापासून होतं. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासून सुरूवात होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी, नव्या वास्तूत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ करतात. हिंदु समाजात आपापल्या घराच्या …
Read More »नामदेववाडीतील प्रश्न सिडकोशी चर्चा करून सोडविणार -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : वार्ताहर वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नामदेववाडी येथील जागा व राहती घरी सिडकोने पुनर्वसन योजनेंतर्गत संपादित केलेली आहे, पण तेथील रहिवाशांचा काही प्रश्न उरला आहे. या संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागातील रहिवाशांनी भेटीस येऊन त्यांची समस्या मांडली आहे. या समस्येवर सिडकोशी चर्चा …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात बैठक
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडली स्थानिकांची भूमिका पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबातचा जीआर राज्य शासनाने काढला आहे, मात्र हा निर्णय घेताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना असणार्या समस्या जाणून घेतल्या नाही किंवा कोणतीही चर्चा केली नाही. या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पावले …
Read More »पनवेल, उरण, चौककरांना गुढीपाडव्याची विकासभेट
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या पनवेलमध्ये – 7700 कोटींच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे होणार लोकार्पण आणि भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल व उरण तालुक्यातील 7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन रविवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार …
Read More »मुलांचे संगोपन चांगल्याप्रकारे करणे हे आदर्श पालकांचे लक्षण आहे -तीर्थ स्वरूपदास स्वामी
स्वामींनी कर्जतमध्ये घेतली पालकांची शाळा कर्जत : प्रतिनिधी मुलांचे संगोपन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल, टीव्हीपेक्षा चांगल्या गोष्टी ऐकायला व वाचायला शिकवल्या पाहिजेत. वयाच्या सहा वर्षांपर्यंत त्यांचे लाड करा मात्र त्यानंतर 16 वर्षांपर्यंत त्यांना शिस्त लावण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला गुरुकुलच्या तीर्थ स्वरूपदास स्वामींनी पालकांना दिला. कर्जत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper