Breaking News

Monthly Archives: September 2022

प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या प्रशासक नियुक्तीचा कार्यकाळ सप्टेंबर 2022मध्ये संपत आहे,  मात्र राज्य निवडणूक आयोगाची प्रक्रिया आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लक्षात …

Read More »

खारघरमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक हैराण

खारघर ः रामप्रहर वृत्त खारघरमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात स्वाईन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजाराचे 50हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खारघर वसाहतीत आजही अनेक …

Read More »

पनवेल तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलन अभियान

पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान कुष्ठरोग व क्षयरोग  निर्मूलन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ. आर. एच. बाविस्कर यांनी दिली. मागील दोन वर्षांमध्ये पनवेल तालुक्यातील 216 कुष्ठरोगी बरे झाले आहे आहेत, तर चालू वर्षी पनवेलमधील 121 कुष्ठरुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक …

Read More »

नैसर्गिक आपत्तीबाधित गावांचे होणार पुनर्वसन

सर्वसमावेशक धोरण निश्चितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टीत निर्माण होणार्‍या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास सोमवारी (दि. 11) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, भूस्खलन …

Read More »

‘लम्पी’वर स्वदेशी लस तयार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. मध्यतंरी कोरोनावर मात करणार्‍या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लम्पी आजारावर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित केली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते ग्रेटर नोएडा येथील वर्ल्ड डेयरी समिटच्या उद्घाटन समारंभात बोलत …

Read More »

निर्माल्यापासून करणार नैसर्गिक खत निर्मिती

नवी मुंबई मनपाचा पुढाकार; 38.795 टन निर्माल्य संकलित नवी मुंबई ः बातमीदार  अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या श्री गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांनी पर्यावरणशील दृष्टिकोन जपत 15 हजारपेक्षा अधिक श्रीमूर्तींचे 134 कृत्रिम तलावात विसर्जन केले. त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले व सुके अशा वेगवेगळ्या कलशातच टाकावे या महापालिकेने केलेल्या आवाहनालाही उत्तम …

Read More »

सिडकोतर्फे 4158 सदनिकांसह वाणिज्यिक गाळे आणि कार्यालये विक्रीची योजना

नवी मुंबई ः बातमीदार सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलांतील सहा कार्यालये (कमर्शियल प्रीमाईसेस) विक्रीच्या योजना सिडको महामंडळातर्फे सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी व व्यावसायिकांना या योजनांच्या माध्यमातून सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा …

Read More »

ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात जनजागृती रॅली

पनवेलमध्ये महिलांसाठी ‘रोटरी’चा उपक्रम पनवेल ः वार्ताहर येथील रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबच्या वतीने पनवेलमध्ये महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात जनजागृती बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. अर्चना परेश ठाकूर यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. या उपक्रमावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्ष ध्वनी तन्ना, मेन्टोर क्लबचे हर्मेश तन्ना, सिम्पल आचालिया, …

Read More »

माणगावात वर्षातून तीनदा भातपीक घेण्याचा प्रयोग

माणगाव ः प्रतिनिधी माणगावमधील एका उद्योजक शेतकर्‍याने वर्षातून तीन वेळा भाताचे उत्पादन घेण्याचा निश्चय केला आहे. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यावर माणगाव तालुका हा भाताचे विक्रमी उत्पादनाचे कोठार म्हणून ओळखला जाणार आहे. कोकणातील शेतकरी पावसाच्या पडणार्‍या पाण्यावर अवलंबून असून इथली भातशेती एकपिकी असल्याने बहुतांशी तरुणवर्ग मुंबई, सुरतमध्ये रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित …

Read More »

धाटाव एमआयडीसीत चार कामगार भाजले

एक्सेल कंपनीत दुर्घटना, एकाची प्रकृती चिंताजनक धाटाव ः प्रतिनिधी रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील एक्सेल कारखान्यात काम करीत असताना आगीच्या ज्वाळा अंगावर आल्याने चार कामगार जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.  एक्सेल इंडस्ट्रीज लि.मध्ये शनिवारी (दि. 10) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. कारखान्यातील ड्रममधून घातक मटेरियल बाहेर काढत असताना …

Read More »