Breaking News

मुंबई – नवी मुंबई

सर्वच क्षेत्रांसाठी तरतुदींचा पाऊस

सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलांसाठी 775 कोटी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 606 कोटींची मान्यता मुंबई ः प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर झाला. या अर्थसंकल्पात कृषी, रोजगार, पायाभूत अर्थव्यवस्था, उद्योग अशा सर्व क्षेत्रांसाठी सोयीसुविधा आणि सवलतींचा पाऊस पाडण्यात आला आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रीलियन डॉलर …

Read More »

पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

मुंबईः प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (दि. 17) सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजास वंदे मातरमने सुरुवात करण्यात आली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह मंत्री, राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विधानसभा सदस्य सर्वश्री सुरेश धानोरकर, प्रतापराव चिखलीकर, हर्षवर्धन …

Read More »

इतिहासाचे भान आणि सार्थ अभिमान आवश्यक ः आ. प्रशांत ठाकूर

बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभिकरणाचे उद्घाटन बेलापूर ः प्रतिनिधी बेलापूरचा किल्ला हा नवी मुंबईचा मानबिंदू असून अशा प्रकारच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे, असे उद्गार सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी काढले. बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभिकरण समारंभाचे उद्घाटन  प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

राज्य मत्रिमडळात 13 नव्या सदस्याचा समावेश

मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळात काल रविवारी 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राजभवनाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास मंत्रिमंडळातील सदस्य, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, यांच्यासह मुख्य सचिव अजोय …

Read More »

रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बेलापूर किल्ला संवर्धनाचा शुभारंभ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोच्या बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभीकरण उपक्रमाचे उद्घाटन रविवारी (दि. 16) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत. या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथील पोर्तुगीजकालीन किल्ल्याचे संवर्धन करून किल्ला व किल्ल्याभोवतालचा …

Read More »

अकरावी प्रवेश वेळापत्रकानुसार

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात साशंकता असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान राज्य शासन होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमित वेळापत्रकानुसारच सुरू करण्यात येत असून या प्रक्रियेला कोणताही विलंब झालेला नाही. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मतभेद

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरत असलेले विरोधी पक्ष आता आपसातील जागावाटप आणि आघाडीच्या पेचात अडकले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये, अशी भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने विधानसभेच्या 50 टक्के जागांची मागणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणार्‍या काँग्रेसला खिंडीत पकडण्याची राष्ट्रवादीची रणनीती …

Read More »

मेट्रो मार्ग क्र. 2-3चे काम लवकरच सुरू

आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल ः प्रतिनिधी सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्र. 2 व 3 विकसित करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांना देण्यात आले आहे, असे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावास तत्त्वत: …

Read More »

सिडकोच्या रेल्वेस्थानक संकुलातील कार्यालयांची ई-लिलाव पद्धतीने विक्री

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजना, तसेच वाणिज्यिक व रेल्वेस्थानक संकुलांतील दुकानांची आणि कार्यालयांची विक्री ई-लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला सिडको संचालक मंडळाने डिसेंबर 2018 मध्ये मान्यता दिली आहे. सिडकोतर्फे दुकाने वा कार्यालयांच्या विक्रीकरिता यापूर्वी पारंपरिक मानवीय निविदा पद्धतीचा वापर करण्यात येत होता. सदर विक्री …

Read More »

चक्रीवादळाचा धोका ; महाराष्ट्रावर धडकणार नाही, किनारपट्टीवर मात्र प्रभाव जाणवेल

मुंबई ः प्रतिनिधी देशाच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 आणि 12 जूनदरम्यान हे चक्रीवादळ धडकणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर हे वादळ राहणार आहे. त्यामुळे राज्याला धोका नाही, असा निर्वाळाही हवामान विभागाने दिला आहे. हे …

Read More »