मुंबई ः प्रतिनिधी ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. या माहितीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राऊत यांच्यावर टीका केली. पात्रा यांच्यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही राऊतांना सवाल केला आहे. ‘ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाले …
Read More »मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत
गुरव समाजाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी पेण : प्रतिनिधी कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने मंदिरे खुली करावीत, अशी मागणी रायगड मुंबई गुरव समाज संघटनेेचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे गेली दोन वर्षे बंद असल्याने अनेक गुरव समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर मंदिराबाहेरील फूल, …
Read More »माणगावात बकरी ईद उत्साहात
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात बुधवार (दि. 21) ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवानी एकमेकांना गळाभेट देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांची घरोघरी भेट घेऊन तसेच दूरध्वनीवरून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही मुस्लिम बांधवानी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध व नियमांचे …
Read More »पूरग्रस्त भागातील पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्या
आमदार रविशेठ पाटील यांच्या अधिकार्यांना सूचना पेण : प्रतिनिधी मुसळधार पावसाने पेण तालुक्यातील बाळगंगा, पाताळगंगा आणि भोगावती या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. आमदार रविशेठ पाटील यांनी मंगळवारी (दि. 20) या पुरग्रस्त भागाची पाहणी केली. व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अतिवृष्टीमुळे पेण …
Read More »अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
पाली व जांभूळपाडा पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (दि. 21) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले. या पुलांच्या दोन्ही बाजूंकडील वाहतूक तासनतास ठप्प झाली होती. तसेच जांभुळपाडा ते कळंब, जांभुळपाडा ते माणगाव बुद्रुक …
Read More »देवदूत मयूर शेळके यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात एका लहान मुलाचा जीव वाचवणारा देवदूत मयूर शेळके यांना कोकण विभाग पत्रकार संघाने कोकण शौर्य हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. कोकण विभाग पत्रकार संघाचा वर्धापन दिन सोहळा बुधवारी (दि. 28) मुरबाड तालुक्यातील संगम येथील देशमुख मराठा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या …
Read More »माणगाव उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप
डॉ. पुरकर यांच्या स्मरणार्थ आवाज परिवाराचा उपक्रम माणगाव : प्रतिनिधी येथील आवाज परिवाराकडून ज्येष्ठ पत्रकार पैगंबरवासी डॉ. महम्मदशफी पुरकर यांच्या स्मरणार्थ बुधवार (दि. 21) सकाळी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना भाजप ओबीसी सेलचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. डॉ. महम्मदशफी पुरकर यांचे गतवर्षी बकरी ईद …
Read More »संभाव्य अपघात टाळण्यासाठी भाजप पदाधिकार्यांनी बजावली दिशादर्शकाची भूमिका
नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर परिसरातील पारसिक हिल वनराई व डोंगराळ भागात रात्रीच्या अंधारात एक वृक्ष कोलमडला व रस्त्यावर पडला. त्यात पावसामुळे पथदिवे बंद असल्याने अपघात होण्याची शक्यता होती. ही माहिती भाजप पदाधिकारी सुभाष गायकवाड यांना मिळताच त्यांनी ते ठिकाण गाठले. त्यानंतर अंधारात वेगात येणार्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना पुढची …
Read More »पाली शहरात बॅनरबाजीला ऊत
शहर होतेय बकाल, नागरिकांमध्ये संताप पाली : प्रतिनिधी अष्टविनायकांपैकी एक क्षेत्र असलेल्या पाली शहराला सध्या बॅनरने वेढले आहे. शहरातील विविध ठिकाणे व स्थळे या बॅनरमुळे बकाल झाली आहेत. येथील छत्रपती शिवाजी स्मारकाच्या कंपाउंडवर लावलेल्या राजकीय पक्षाच्या बॅनरमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर हा बॅनर काढण्यात आला असला तरी शहरातील बॅनरबाजी …
Read More »शिक्षक, अंगणवाडी सेविकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका
उरण : वार्ताहर उरणमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यास सांगितले आहे, पण या टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या बोकडवीरा येथील कोविड केअर सेंटर येथे करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनाही कोविड संसर्ग होण्याची शक्यता आहे. या कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त केली असून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper