Breaking News

महत्वाच्या बातम्या

टीम इंडियाची मिल्खा सिंग यांना अनोखी आदरांजली

लंडन ः वृत्तसंस्था भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथम्प्टन येथे खेळला जात आहे. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी (दि. 18) निधन झाले. मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू हातात काळ्या रंगाचे आर्मबँड घालून मैदानात उतरले. कोरोनाशी झुंज देणार्‍या मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91व्या वर्षी …

Read More »

अर्जेंटिनाने बलाढ्य उरुग्वेवर केली मात; कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत रॉड्रिगेज चमकला

साव पावलो ः वृत्तसंस्था कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील ‘एल क्लासिको’ लढत म्हणून ओळखल्या जाणार्‍या अर्जेंटिना विरुद्ध उरुग्वे यांच्यातील सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने सरशी साधली. या लढतीत गुइडो रॉड्रिगेजच्या एकमेव गोलच्या बळावर अर्जेंटिनाने 1-0 असा विजय मिळवून गटात अग्रस्थान मिळवले. इस्टाडिओ नॅशनल दी ब्राझिलिया स्टेडियममध्ये झालेल्या ‘अ’ गटातील या सामन्यात रॉड्रिगेजने …

Read More »

नेरळ ग्रामपंचायत सत्ताबदलाच्या उंबरठ्यावर

रायगड जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून मिरवणारी नेरळ ग्रामपंचायतीमधील सत्ता शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये नजीकच्या काळात राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे आहेत. थेट सरपंच म्हणून निवडून आलेले रावजी गोमा शिंगवा यांचे आकस्मिक निधन झाल्याने आता नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सदस्यांतून निवडले जाणार …

Read More »

‘मविआ’तील सुंदोपसुंदी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे बिनपैशांचा तमाशा आहे. या सरकारच्या स्थापनेला एक वर्ष होऊन गेले, मात्र यांच्यातील कुरबुरी काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत. उलट त्या वाढत चालल्या असल्याचे दिसून येते. आता तर यांची मजल एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. राज्यात गत विधानसभा निवडणुकीनंतर …

Read More »

डिकसळ-भिवपुरी रस्त्याची दुरुस्ती

कर्जत ः बातमीदार डिकसळ गावातून भिवपुरी रोडकडे जाणारा उमरोली ग्रामपंचायतीने बांधलेला सिमेंटचा रस्ता खराब झाला होता. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, तेथील व्यावसायिकांनी दगड, खडी टाकून रस्ता सुस्थितीत केल्याबद्दल भिवपुरी रोड रेल्वेस्टेशन प्रवासी संघाने त्यांचे आभार मानले आहेत. मध्य रेल्वेच्या कर्जत एण्डकडे असलेल्या …

Read More »

खालापुरात लाखोंचा गहू जप्त; दोघांना अटक

खोपोली ः प्रतिनिधी  काळ्या बाजारात विक्रीकरिता नेण्यात येत असलेला सुमारे साडेचौदा लाखांचा गहू स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग-रायगड यांनी खालापूर टोलनाक्यावर पकडला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. साकीनाका मुंबई येथील गोडाऊनमधील रेशनवर वितरित करण्यासाठी आणलेला गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस …

Read More »

निवृत्तीत आर्थिक स्वावलंबनाचा विचार करता आहात ना?

निवृत्तीच्या काळात आपल्या आर्थिक गरजा आपल्याच उत्पन्नातून भागल्या पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटते. पण असे होण्यासाठी निवृत्त होईपर्यंत तयारी करणे आवश्यक असते. त्या तयारीचा भाग असलेले हे काही महत्त्वाचे मुद्दे भविष्याची फार चिंता करू नये, असे म्हणतात. पण ती चिंता करत नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. विशेषतः वाढत्या आर्थिक गरजांमुळे, …

Read More »

‘फायनान्शियल वेल्थ’च्या वाढीकडे आपले लक्ष का असले पाहिजे?

विकसित देशांमध्ये गेली अनेक दशके ‘फायनान्शियल वेल्थ’ वाढत गेली, तशीच ती सध्या भारतात वाढण्यास सुरुवात झाली आहे. या बदलाचे अनेक पैलू आहेत. ते एक देश म्हणून आणि गुंतवणूकदार म्हणून समजून घेण्याची गरज आहे. आपल्या देशातील वाढत्या डिजिटलायझेशनमुळे आर्थिक व्यवस्था पारदर्शी होऊ लागली आहे आणि त्याचाच पुढील भाग म्हणजे गुंतवणुकीचे मार्गही …

Read More »

फसवणूकप्रकरणी पनवेल शेकाप उपाध्यक्ष अब्दुल कच्छी गुजरात पोलिसांच्या ताब्यात

पनवेल ः वार्ताहर शेकापचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी यांना गुजरात राज्यातील पोलिसांनी फसवणूकप्रकरणी पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे. शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी (44)  यांच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा 420, 120 बीसह आयटी अ‍ॅक्ट …

Read More »

शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘दिबांं’चा सरकारला अंतिम इशारा!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… 1984च्या आंदोलनानंतर सरकारशी वाटाघाटी झाल्या. त्या वेळी विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार …

Read More »