Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्यातील निर्बंध बदलले

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटचा धोकादेखील वाढू लागल्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसर्‍या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे. जमावावर बंदी कोविड-19 जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे …

Read More »

पुनश्च निर्बंध

गेल्या दोन वर्षांपासून उद्भवलेली कोरोना महामारी काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सरला असे वाटत असतानाच हा विषाणू नवनवी रूपे घेऊन अधिक घातक पद्धतीने आक्रमण करीत आहे. आपल्या देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन-अनलॉकचा लपंडाव रंगताना …

Read More »

लसीकरण मोहिमेत योगदान द्या!

पंतप्रधानांचे ‘मन की बात’मधून देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कोरोनाच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले, तसेच लसीसंबंधीच्या अफवांपासून दूर राहून लसीकरण मोहिमेत आपले योगदान द्या, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

इगतपुरीत रेव्ह पार्टीचा धांगडधिंगा

22 जण ताब्यात; सिनेसृष्टीतील चार महिलाही सहभागी नाशिक ः प्रतिनिधीनाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे रविवारी (दि. 27) पहाटेच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी एका हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर धाड टाकली. मुंबई-आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्टमधील स्काय ताज व्हिलातील दोन बंगल्यांत रेव्ह पार्टीचा धांगडधिंगा सुरू होता. या धाडीत ड्रग्ज व हुक्का सेवन करताना 22 …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचे राजकारण

प्रवीण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांना आदळआपट वाटते. मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल, तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचे राजकारण करीत असल्याची टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी (दि. 27) मुंबईत शिवसंग्राम संघटनेचे नेते …

Read More »

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण गेले

नागपूर ः प्रतिनिधीमराठा आरक्षणापाठोपाठ राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, शनिवारी (दि. 26) राज्यभरात चक्का जाम आंदोलन केले.  नागपुरात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात सहभागी होत महाविकास आघाडी सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. …

Read More »

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन

कार्यकर्त्यांनी रोखला पनवेल-सायन महामार्गराज्य सरकारविरोधात कळंबोलीत घोषणाबाजी पनवेल, कळंबोली ः प्रतिनिधीमराठा आरक्षणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे. महाविकास आघाडी सरकारने योग्य बाजू न मांडल्याने किंबहुना त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. ओबीसी समाजावरील हा अन्याय दूर होऊन त्यांना …

Read More »

उरुग्वे उपांत्यपूर्व फेरीत

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील बोलिव्हियाचे आव्हान संपुष्टात क्यूबा ः वृत्तसंस्थाप्रमुख आक्रमणपटू एडिन्सन कव्हानीने तब्बल सात महिन्यांनंतर झळकावलेल्या पहिल्या गोलच्या बळावर उरुग्वेने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. अ गटातील या लढतीत उरुग्वेने 2-0 असा विजय मिळवून बोलिव्हियाचे आव्हान स्पर्धेतून संपुष्टात आणले.क्यूबा येथील एरिना पँटानल येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात …

Read More »

भारतीय महिला संघाला कांस्यपदक

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा ओसिजेक (क्रोएशिया) ः वृत्तसंस्थाराही सरनोबत, मनू भाकर आणि यशस्विनी सिंग देस्वाल या भारतीय त्रिकुटाने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय संघाने हंगेरीच्या संघाला (व्हेरोनिका मेजर, मिरआम जॅको आणि सारा राहेल फॅबियान) 16-12 असे पराभूत केले. पात्रता स्पर्धेत …

Read More »

आयपीएलपाठोपाठ टी-20 वर्ल्डकपही यूएईत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा टी-20 वर्ल्डकप यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. हे सामने यूएईत होत असले, तरी बीसीसीआयकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.वर्ल्डकप टी-20 स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार …

Read More »