Breaking News

महत्वाच्या बातम्या

मंत्र्यांचे न्यारे बंगले!

कुठल्याच प्रश्नाबाबत महाआघाडी सरकारमधील मंत्री गंभीर नाहीत हे तर स्पष्टच दिसते आहे. या मंत्री महोदयांना ना कोरोना बळींची चिंता आहे, ना शेतकर्‍यांची. राज्याची आर्थिक व्यवस्था पार कोलमडलेली आहे. अशा परिस्थितीत एखादे संवेदनशील सरकार असते तर परिस्थिती खचितच वेगळी असती. पण महाआघाडीतील मंत्र्यांना आपल्या सरकारी बंगल्यांच्या सुशोभिकरणातच अधिक रस आहे असे …

Read More »

विद्यार्थी वाहतूकदारांचे लाक्षणिक उपोषण; भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा; कोरोनामुळे बंद असलेल्या व्यवसायासाठी राज्य शासनाकडे भरपाईची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त कोविडच्या महामारीमुळे सर्व शाळा बंद आहेत. परिणामी विद्यार्थी वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थी वाहतूकदारांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यभर उपोषण केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ व विद्यार्थी वाहतूक संस्था, पनवेल यांच्या वतीने सोमवारी (दि. 14) पनवेल तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण …

Read More »

रायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी  पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.रायगडमध्ये रिमझिम रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी  पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण …

Read More »

शेतकरी संघटनांचे कृषी कायद्यांना समर्थन

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएकीकडे हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी सुधारित कृषी कायद्यांबाबत निदर्शने करीत असताना दुसरीकडे विविध राज्यांतील सुमारे 10 शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची सोमवारी (दि. 14) भेट घेतली आणि कृषी कायद्यांना पाठिंबा देत असल्याबाबतची पत्रे तोमर यांच्याकडे सुपूर्द केली.याबद्दल माध्यमांशी बोलताना तोमर …

Read More »

कृषी कायद्यांच्या आडून देशात अराजक माजविण्याचा विरोधकांचा प्रयत्न

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा आरोप पनवेल : रामप्रहर वृत्तसुधारित कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे, तसेच या आंदोलनाच्या आडून काही विरोधी शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न …

Read More »

मराठा आरक्षण मागणार्‍यांविरुद्ध सरकार हुकूमशाहीने वागतेय -दरेकर

मुंबई ः आपल्या न्याय्य हक्काचे आरक्षण मागणार्‍या मराठा तरुणांविरोधात सरकार हुकुमशाहीने वागत असून, याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली आरक्षण मिळण्याच्या मागणीबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी नोकरी न मिळालेले मराठा तरुण आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. दरेकर यांनी रविवारी तेथे भेट …

Read More »

हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी

शेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सोमवार (दि. 14)पासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. शेतकर्‍यांपर्यंत न पोहोचलेली मदत, मराठा, ओबीसी समाजाचे प्रश्न आदी विषयांवर विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. देशात, जगात काय चाललंय यापेक्षा इथल्या शेतकर्‍यांच्या …

Read More »

पेणमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी येथील कच्छ युवक संघ, गुजराती समाज व जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 13) पेणमधील जैन समाज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सर्वधर्मियांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. या वेळी डॉ. विनिता …

Read More »

कळंब-नेरळ एसटी बस सुरू करण्याची विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मागणी

कर्जत : बातमीदार कोरोनाच्या काळात बंद केलेली एसटीची कळंब-वारे ते नेरळ बससेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.  कोरोनाच्या काळात सतर्कता म्हणून एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती, मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कर्जत तालुक्यातील कळंब परिसरामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नेरळ तसेच पोशीर येथे जावे लागते. …

Read More »

मोर्चेकर्यांना मुंबईत नो एण्ट्री

खालापूर टोल नाक्यावर वाहनांची कसून चौकशी खालापूर : प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय होत नसल्यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी आधिवेशनादरम्यान राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार निदर्शने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईत पोहचू नयेत यासाठी पोलिसांनी एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाक्यावर वाहनांची कसून तपासणी …

Read More »