Breaking News

महत्वाच्या बातम्या

खालापूरजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात

दोघांचा मृत्यू, चौघे जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सोमवारी (दि. 29) सकाळी सव्वासातच्या सुमारास खालापूर टोलनाक्याजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर रस्त्यावरच आडवा मुंबईकडे जाणार्‍या वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.बोरघाटाच्या पायथ्याशी असणार्‍या ढेकू …

Read More »

मुरूडमधील सरसकट बंद चुकीचा; भाजपची भूमिका

मुरूड : प्रतिनिधीमुरूड शहरात काही राजकीय पक्षांनी अनधिकृतपणे तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. गंभीर बाब म्हणजे या बंदमध्ये मेडिकल आणि दूध डेअरी यांनाही मुभा देण्यात आलेली नाही. हा सरसकट बंद चुकीचा असून, या बंदचा आम्ही निषेध करतो, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 29) पत्रकार परिषद घेऊन …

Read More »

कर्जतसह कडाव, डिकसळमध्येही कडकडीत बंद

कर्जत : प्रतिनिधीकर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून  कर्जतच्या व्यापारीवर्गाने सोमवार (दि. 29)पासून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. कर्जत शहराबरोबरच कडाव आणि डिकसळसुद्धा बंद ठेवण्यात आले आहे.एका उत्तरकार्यात उपस्थिती दर्शविल्यामुळे 21 जणांना कोरोनाची लागण झाली. …

Read More »

माणगावात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

माणगाव : प्रतिनिधीमाणगाव नगरपंचायत हद्दीत गेल्या आठ दिवसांमध्ये शासकीय कार्यालयांबरोबरच घरांतून 19 कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून माणगावकरांनी एकत्र येऊन घेतलेल्या बैठकीत पाच दिवस स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी (दि. 29) पहिल्याच दिवशी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यापासून माणगाव नगरपंचायत हद्दीत कोरोनाचे रुग्ण …

Read More »

वीज ग्राहकांना दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तलॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी लक्षात घेता महावितरणकडून करण्यात आलेली अंदाजित वाढीव वीज देयके तातडीने रद्द करून ग्राहकांनी वापरलेल्याच विजेची  देयके देण्यात यावी आणि ही वीज देयके भरण्यास मुदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे ऊर्जा, नवीन आणि …

Read More »

माणगावमध्ये अद्यापही वीजपुरवठा खंडित

ग्रामस्थ करताहेत महावितरण कर्मचार्‍यांना सहकार्य माणगाव : प्रतिनिधीरायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. या वादळात अनेक ठिकाणचे विद्युत खांब आणि वीजवाहक तारा पडल्या. त्यामुळे गेल्या 25 दिवसांहून अधिक काळ माणगाव तालुक्यातील काही गावे अंधारात आहेत. या गावांतील ग्रामस्थ विशेषत: तरुण वीजपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी महावितरण कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून …

Read More »

कासाडी नदीत रसायनमिश्रित पाणी

कळंबोली : प्रतिनिधी – तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून सोडण्यात येणार्‍या विघातक आणि दर्पयुक्त रसायनमिश्रित पाण्याने कासाडी नदीच्या पाण्याला लाल रंग आल्याने परिसरातील नागरिकांत घबराघटीचे वातावरण पसरले आहे. या विभागातील कारखान्याच्या विघातक प्रदुषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांचे जीवन उध्वस्त झाले आहे. संबंधित कारखान्यांवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांतून …

Read More »

पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; दोन पोलीस कर्मचारी जखमी

खोपोली : बातमीदार – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक वाहन उलटल्याची घटना सोमवारी (दि. 29) सकाळी मुंबई-पूणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली घडली. अपघातात पोलीस गाडीतील चालकासह एक जण जखमी झाला आहे. शरद पवार सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ त्यांच्या …

Read More »

पनवेल तालुक्यात 181 जणांना कोरोनाची लागण

चौघांचा मृत्यू; 68 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 29) कोरोनाचे तब्बल 181 रुग्ण आढळले असून हा आतापर्यंतचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. तर दिवसभरात 68 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 131 कोरोनाबाधित …

Read More »

राज्य गोंधळात, राज्यकर्ते सुशेगात

महाराष्ट्रातील कमालीच्या गोंधळलेल्या आणि गोंधळ घालणार्‍या तीन चाकी आघाडी सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अशी आंग्ल भाषिक घोषणा करीत अखेर 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमांद्वारे जनतेशी प्रदीर्घ संवाद साधताना कोणतीही ठोस माहिती न दिल्यामुळे सामान्य जनांमधील गोंधळ कायम असून जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढच झाली आहे. अनलॉक …

Read More »