मुंबई : प्रतिनिधीमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन समतेसाठी वाहिले. त्यांनी भारताला दिलेल्या संविधानाचे सार समतेच्या तत्त्वात आहे. त्यामुळे समतेचे प्रज्ञासूर्य ठरलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदाच्या 14 एप्रिलला आपल्या घरीच राहून साजरी करताना घराघरात समतेचे दीप लावण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री …
Read More »पनवेल शहरात कोरोनाची दस्तक
चालकाला लागण; तालुक्यासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या 29 पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहरपनवेल शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण ओलाचालक असून तो इस्रायल (विश्राळे) तलाव परिसरातील रहिवासी आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 27, तर रायगड जिल्ह्यातील आकडा 29वर पोहचला आहे.पनवेल शहरातील इस्रायल तलाव परिसरात राहणारा चालक मुंबई विमानतळावरून प्रवाशांना ओलाची …
Read More »पंतप्रधान मोदी आज काय बोलणार? देशाला उत्सुकता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि. 14) सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. कदाचित ते लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा करू शकतात. काही राज्यांनी यापूर्वीच लॉकडाऊन वाढवले असले तरी अन्य बहुतांश राज्ये अजूनही केंद्राच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. शिवाय रेल्वे, विमान अशा विविध सेवा केंद्राच्या अखत्यारित असल्यामुळे पंतप्रधान …
Read More »शासकीय अधिकारी, कर्मचार्यांची आरोग्य तपासणी
अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी -कर्मचार्यांचीही तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीदेखील सोमवारी (दि. 13) स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्न करीत आहेत. आरोग्य यंत्रणेबरोबर जिल्हा आणि पोलीस प्रशासनही काम करीत आहेत. शासकीय कार्यालयात येणार्या …
Read More »पुढील धोरणाची दिशा
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मदत होत आहे, तेव्हा लॉकडाऊन वाढवायला हवा, असे मत देशातील बहुतेक मुख्यमंत्र्यांनी नोंदवले असले तरी पहिल्या लॉकडाऊनसारखाच हा दुसरा लॉकडाऊनही असेल की या वेळी काही वेगळे धोरण अनुसरले जाईल हे मोदीजींच्या मंगळवारच्या संदेशानंतरच स्पष्ट होऊ शकेल. भारतात कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »शेतकर्यांचा माल थेट आपल्या दारात योजना सुरू; सोसायट्यांनी पालिकेच्या अॅपवर नोंदणी करण्याचे आवाहन
पनवेल : बातमीदार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता यावर पर्याय काढण्यासाठी पालिका प्रशासन अनेक युक्त्या आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन रात्रीचा दिवस करून काम करत आहे. या वेळी भाजी मंडईमध्ये होणारी …
Read More »उद्योजक संजय नोगजा यांच्याकडून पत्रकारांना मदतीचा हात
पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या संकटाने व लॉकडाऊनमुळे सर्वजणच आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहेत. पनवेल परिसरातील पत्रकारही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीतही कोरोनाची परिस्थिती रोजच्या रोज जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकार करीत आहेत. पत्रकारांची ही अडचण ओळखून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी नगराध्यक्ष, उद्योगपती जे.एम. म्हात्रे यांनी मदतीचा हात …
Read More »शेलू येथे नरेश मसणे यांच्याकडून धान्यवाटप
कर्जत : बातमीदार कर्जत तालुका पंचायत समितीचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे नरेश मसणे यांनी शेलू गावातील गरीब लोकांना धान्य वाटप करण्यात आले. शेलू गावातील रोजंदारी कामगार आणि विधवा महिला यांना मदत केल्याने त्यांना आधार मिळाला आहे. शेलू गावात घरोघरी जाऊन कर्जत पंचायत समितीचे सदस्य नरेश मसणे यांनी धान्य वाटप आयोजित …
Read More »अलिबागमध्ये काळाबाजार करणार्या रेशन दुकानावर गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; 51 हजारांचा माल पोलिसांनी केला जप्त
अलिबाग ः प्रतिनिधी धान्याचा काळाबाजार करणार्या अलिबाग तालुक्यातील रेशन दुकानावर रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. या कारवाईत 51 हजारांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. टाळेबंदीच्या काळात शासनाकडून रेशन दुकानांवर स्वस्त दरात धान्यविक्री केली जात आहे, परंतु काही रेशन दुकानदार शिधापत्रिका धारकांव्यतिरिक्त इतर लोकांना अधिक दराने धान्यविक्री …
Read More »वादळी पावसाचा आंबा उत्पादकांना फटका; पोलादपूर तालुका कृषी अधिकार्यांचा प्राथमिक अंदाज
पोलादपूर : प्रतिनिधी चैत्र प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच गुढीपाडव्याच्या दिवशी वादळी पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील 87 पैकी 37 गावांमधील शेतकर्यांना आर्थिक फटका बसला असून यामध्ये 35 गांवातील शेतकरी आंबा उत्पादक असल्याचा प्राथमिक अंदाज पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांच्या कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालामध्ये व्यक्त केला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper