Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जत येथे जिल्हा कॅरम निवड चाचणी स्पर्धा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी कार्यवाह स्व. नथुराम पाटील यांच्या स्मरणार्थ 23 व 24 जुलै रोजी जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड स्पर्धा कर्जत येथे आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे कर्जत दहिवली येथील भवनात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष …

Read More »

नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई ः प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास शनिवारी (दि. 16) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावाचा निर्णय

भाजपतर्फे आभार आणि जल्लोष पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी (दि. 16) मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला आहे, त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी …

Read More »

मोरबे धरणात यंदा कमी पाणीसाठा

पूर्ण भरण्यासाठी 2300 मिमी पावसाची आवश्यकता नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जून महिना कोरडा गेल्याने नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणाची पाणी पातळी खालावली होती, मात्र मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण पातळी चांगलीच वाढली आहे. धरणात आतापर्यंत 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर धरण शंभर टक्के भरण्यासाठी …

Read More »

पावसाचा फटका भाजीपाल्याला; भाज्यांचे दर गडगडले

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी भाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. एपीएमसीमध्ये सध्या पाचशे ते साडेपाचशे गाड्यांची आवक होत आहे. यामुळे जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी भाजीपाला दर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी तब्बल प्रतिकिलो शंभरी गाठलेला टोमॅटो आता 20 ते …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातील पडलेली झाडे बाजूला

गाढी नदीकाठीही बांधले दोरखंड पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे महापालिकेच्या अग्निशमन दल तसेच प्रभाग समितीच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने काढण्यात आली. गाढी नदी काठाला लागून असलेले पटेल मोहल्ला, भारत नगर झोपटपट्टी, कोळीवाडा गाढी नदी पुलावर सुरक्षिततेसाठी पालिका कर्मचारी तसेच कोळी बांधवांच्या साहाय्याने दोरखंड बांधण्यात आले आहेत. …

Read More »

पनवेलमध्ये भजनी भक्तिरंग कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघात गुरूपौर्णिमेनिमित्त भक्तिरंग कार्यक्रमाचे बुधवारी (दि.13) आयोजन केले होते. दत्ता ढोले यांनी सादर केलेल्या श्री दत्तगुरू स्तवन स्तोत्राने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रथेप्रमाणे आठवड्यांतील सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. उपाध्यक्षा माधुरी गोसावी यांनी पर्जन्य सहलीबाबत माहिती दिली. त्यानंतर संघाच्या भजनी महिला मंडळाचे …

Read More »

पूर परिस्थितीतील योजनाबाबत चर्चा

उरण : वार्ताहर दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडत आहे त्यामुळे रानसई धरण ओव्हर फ्लो झाले आहे. हे धरण पुर्णता भरल्यानंतर त्याचे पाणी सोडल्यावर व अतिवृष्टीमुळे कंठवली, विन्धानेव, बोरखार, चिरनेर, दिघोडे या गावातील घरान्माध्ये पाणी जाऊन पूर येऊन आपत्कालीन परिस्थती निर्माण होऊ शकते. त्या अनुशंगाने मंगळवार (दि. 12) उपाययोजनाबाबत …

Read More »

सर्पमित्रांना ओळखपत्र, मोफत उपचार व विमा संरक्षण द्या

वटवृक्ष सामाजिक संस्थेची मागणी उरण ः बातमीदार जागतिक सर्प दिनाचे औचित्य साधून सर्पमित्रांना शासन मान्य अधिकृत ओळखपत्र तसेच स्नेक रेस्क्यू ऑपरेशन करताना सर्पदंश झाल्यास मोफत उपचारासोबत त्यांना विमा संरक्षण कवच मिळण्याबाबत उरण वनविभागाचे वन क्षेत्रपाल एन. जी. कोकरे यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे मागणी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी केली. …

Read More »

नकारात्मकतेला स्थगिती

शिंदे-फडणवीस सरकार कुठलाही विचार न करता महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देत आहे अशी टीका विरोधक करत आहेत. परंतु त्यात तथ्य नाही. मागील सरकारने रुजवलेली नकारात्मकता उखडून फेकायची असेल तर असे काही निर्णय घ्यावे लागणारच. गैरमार्गाने सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकण्यासाठी अडीच वर्षे जावी लागली. ठाकरे सरकारचा कारभार …

Read More »