अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. 25) जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आघाडी सरकारच्या गैरव्यवहाराबद्दल प्रामुख्याने शेतकर्यांची फसवणूक, महिलांवरील अत्याचार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या विविध योजना व कामांना देण्यात आलेली स्थगिती या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात येणार …
Read More »महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ खोपोली भाजपचे स्वाक्षरी आंदोलन
खोपोली : प्रतिनिधी महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत राज्यातील आघाडी सरकारला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीत स्वाक्षरी मोहीम आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शहरातील शेकडो महिलांनी या मोहिमेत भाग घेतला. खोपोली शहरातील दीपक चौकात पार पडलेल्या या स्वाक्षरी मोहीम आंदोलनात अश्विनीताई पाटील, शोभाताई काटे, …
Read More »खोपोली पालिकेची दिरंगाई; रस्त्यासाठी ताकई ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा
खोपोली : प्रतिनिधी निधी मंजूर होऊनही ताकई रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास खोपोली नगरपालिकेकडून दिरंगाई केली जात आहे, त्यामुळे संतप्त ताकई ग्रामस्थांनी नगरपालिका कार्यालयात जावून मुख्याधिकारी गणेश शेटे यांची भेट घेतली व ताकई रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरूवात केली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याची दुरावस्था झाली …
Read More »छत्रपती शिवराय आपल्या रक्तात असले पाहिजेत -डॉ. सागर देशपांडे
कर्जत : प्रतिनिधी शिवजयंती आहे, त्या दिवशी फेटे बांधणे, ढोल ताशा, डीजेच्या संगीतावर मिरवणूका काढणे इतक्यावरच न थांबता शिवाजी महाराजांचा एक गुण जरी अंगिकारला तरी जीवनाचे सार्थक होईल. शिवराय आपल्या रक्तात असले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते डॉ. सागर देशपांडे यांनी येथे केले. कोंकण ज्ञानपीठाच्या कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष …
Read More »महाड ‘रोटरी’तर्फे शीत शवपेटीचे वाटप
महाड : प्रतिनिधी येथील रोटरी क्लबच्या वतीने एका छोटेखाणी कार्यक्रमात महाडमधील चार प्राथमिक शाळांना आणि गोरेगावमधील एका शाळेला हॅन्डवॉश सेंटर, एसटीकरिता व्हीलचेअर आणि जनकल्याण रक्तपेढीला शीत शवपेटीचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब महाडच्या वतीने ग्रामीण भागातील कांबळे तर्फे महाड येथील मराठी आणि उर्दू शाळा तसेच लोणेरे, शिंदेकोंड, वहूर येथील प्राथमिक …
Read More »चिल्हार नदीवर साकारला वनराई बंधारा; सुगवे ग्रामस्थांचे श्रमदान; शेतकर्यांची समस्या सुटणार
कर्जत ़: बातमीदार तालुक्यातील सुगवे गावाच्या पाठीमागून चिल्हार नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. मात्र हीच चिल्हार नदी उन्हाळ्यात कोरडी असते. सुगवे ग्रामस्थांनी बोरिवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चिल्हार नदीवर मोठ्या आकाराचा वनराई बंधारा बांधला आहे. या वनराई बंधार्यामुळे परिसरात तब्बल एक किलोमीटर अंतर भागात पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यातील चिल्हार …
Read More »महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात पनवेलमध्ये उद्या एल्गार
पनवेल : रामप्रहर वृत्त जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता शेतकर्यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकीरपणामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहारांत दिवसेंदिवस वाढ होत असताना राज्य सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. या सरकारमध्ये निर्यणक्षमता …
Read More »राज्य सरकारमध्ये विसंवाद; देवेंद्र फडणवीस यांची टीका; चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारने रविवारी (दि. 23) आयोजिलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला. ’सध्याच्या सरकारमधील पक्षांमध्ये आपसातच सुसंवाद नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे त्यांनी आधी आपसात संवाद साधावा. मग आम्हाला चहापान व सुसंवादासाठी बोलवावे,’ असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »पठाण हे औरंगजेबाचे ’वारिस’ : मुनगंटीवार
मुंबई : प्रतिनिधी देशातील हिंदूंविरोधात मुस्लिमांना चिथावणी देणारे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. वारिस पठाण हे औरंगजेबाचे ’वारिस’ झाले आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथील एका जाहीर सभेत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण …
Read More »तळोजा आत्महत्या प्रकरण; व्हॉट्सअॅ प डिपीतून मृत्यूशी संवाद
पनवेल : वार्ताहर तळोजात कुटुंबासह आत्महत्या करणारे नितीश उपाध्याय यांनी घरात दोन वेगवेगळ्या सुसाईड नोट्स लिहून ठेवल्या होत्या, तसेच त्यांनी व्हॉट्सअॅप डिपीवर मृत्यूशी संवाद साधत असल्याचा फोटो ठेवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वी तळोजा फेज 1मधील शिवकॉर्नर सोसायटीत भाडेतत्त्वावर राहणार्या उपाध्याय कुटुंबीयांनी आर्थिक संकटातून गळफास घेऊन आत्महत्या केली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper