महिलांची रात्री विहिरीजवळ धावपळ; रात्र काढावी लागतेय जागून कर्जत : बातमीदार तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीमधील बोंडेशेत या आदिवासीवाडीत मागील 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिला विहिरीवर थांबून थेंबथेंब साठून राहणारे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी रात्र जागून काढत आहेत. कर्जत तालुक्याच्या आदिवासी आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात …
Read More »Yearly Archives: 2019
मी निर्दोष; विनाकारण गुंतविले -संजय पाटील
पनवेल : रामप्रहर वृत्त मी कोणत्याही प्रकारे मतदारांना पैसे वाटप केले नाहीत किंवा पैशांचे आमिषही दाखविले नसताना विनाकारण त्या प्रकरणात गुंतविण्याचा प्रकार झाला असून, मी पूर्णतः निर्दोष आहे, असे देवद येथील भाजपचे युवा कार्यकर्ते संजय हिरामण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बोलताना संजय पाटील यांनी सांगितले की, मी व्यावसायिक …
Read More »आमदार हनुमंत डोळस यांचे निधन
पंढरपूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस (58) यांचे मंगळवारी (दि. 30) मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झाले. पोटाच्या कर्करोगाने आजारी असलेल्या डोळस यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि अखेर मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. माळशिरस तालुक्यातील दसूर हे डोळस यांचे …
Read More »दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा
मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. राज्यात उन्हाच्या झळा असून, दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. …
Read More »राज्यात मतदानाची सरासरी कमी होण्यास जबाबदार कोण?
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सोमवारी झाले. राज्यात शेवटच्या टप्प्यात सरासरी 57 टक्के मतदान झाले. राज्यात मतदानाची सरासरी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मतदान कमी होण्याला वाढते तापमान हे कारणीभूत आहेच, पण त्याबरोबरच निवडणूक शाखा, निवडणुकीच्या कामासाठी नेमलेले कर्मचारी आणि ओळखपत्र बनवणारे ठेकेदारही जबाबदार आहेत. …
Read More »मतदारराजा उत्तीर्ण
आपल्याला पुन्हा एकवार देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ हातांमध्ये सोपवायचा आहे, या भावनेने आपण घराबाहेर पडल्याचे पनवेल, खारघर, कर्जत, उरण येथील कित्येक मतदारांनी नमूद केले. इथल्या मराठी मतदारांसोबतच बिगर-मराठी, जैन व गुजराती समाजातील मतदारांनीही ही भावना उघडपणे व्यक्त केली. यंदाची लोकसभेची निवडणूक जितकी अटीतटीची आहे, तितकीच ती जनतेची लोकशाहीवरची …
Read More »म्हावरं मिळेना जाळ्यानं; मच्छीमार हतबल!
एलईडी लाईट, पर्सनेट जाळी नौकांमुळे समुद्रात मच्छीचा दुष्काळ रेवदंडा : प्रतिनिधी एलईडी लाईट व पर्सनेट जाळी असलेल्या नौका फार मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी करीत असल्याने समुद्रात मच्छीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे समुद्रात जाऊनही जाळ्यांत म्हावरं येत नसल्याने स्थानिक मच्छीमार बांधव हतबल झाले आहेत. थेरोंडा, आग्राव, रेवदंडा, कोर्लई, बोर्ली परिसरातील कोळी …
Read More »रोह्यात काजू बियांची आवक वाढली
आंब्याच्या कैर्याही खवय्यांच्या पसंतीला रोहे ः प्रतिनिधी येथील बाजारपेठेत काजू बिया आणि आंब्यांच्या कैर्यांची आवक वाढली असून, त्यामुळे आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे. काजू बियांची भाजी आणि आंब्यांच्या कैर्याच्या कापून तयार केलेल्या फोडी हे कोकणातील खवय्यांचे आवडते खाद्य पदार्थ आहेत. मार्च, एप्रिलमध्ये खवय्ये या दोन्ही फाळांचा बाजारात शोध घेताना …
Read More »क्लासला गेलेली दोन मुले बेपत्ता
पनवेल : बातमीदार कळंबोली येथील क्लास सुटल्यावर बाहेर पडत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने दोन मुलांचे अपहरण केले आहे. अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावीच्या क्लासला गेलेला 16 वर्षीय अभिषेक बाळासाहेब राखुंडे व दुसरा 14 वर्षीय अभय सुरेंद्र पांडे क्लासला गेले होते, मात्र ते घरी परत न आल्याने पालकांनी …
Read More »कर्जत मतदारसंघाची मतदान यंत्रे सकाळी निघाली…
सर्वात उशिरा झाला प्रवास सुरु कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघांतील कर्जत विधानसभा मतदारसंघात 67.76 टक्के मतदान झाले आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे मंगळवारी (दि. 30) सकाळी साडेसात वाजता पुणे येथे बालवाडी येथे जाण्यास निघाली.दरम्यान, सर्वात उशिरा कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या मतपेट्या बालेवाडी येथे पोहचल्या आहेत. पाच ठिकाणी ईव्हीएम मशीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper