कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार शेतकर्यांची क्रयशक्ती वाढण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसाय आवश्यक असून त्यासाठी पशू प्रजनन, त्यांचे संगोपन, पोषण आणि रोगराईपासून संरक्षण या चार बाबींचे व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोनातून व्हायला हवे, असे प्रतिपादन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर समाज सेवा …
Read More »Yearly Archives: 2020
आदिवासी विद्यार्थिनींना सायकल वाटप
कर्जत : बातमीदार जाईन्स ग्रुप ऑफ भायखळा आणि जाईन्स ग्रुप ऑफ इनलँड सिटी जाईन्स ग्रुप माझगाव ग्रिन तसेच कर्जत येथील सुमंतू फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त वतीने व उद्योजक संतोष भोईर यांच्या पुढाकाराने आदिवासी मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ आदिवासीवाडीमधील समाजमंदिरात झालेल्या या सायकल …
Read More »मुरूड तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर; तहसीलदार गमन गावित यांचा दावा
मुरूड : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांना येथील जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याने मुरूड तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असून कोरोनामुक्त होणारा हा राज्यातील पहिला तालुका ठरणार आहे, असा दावा तहसीलदार गमन गावित यांनी केला. ते रविवारी (दि. 18) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुरूड तालुक्यात आतापर्यंत 431 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण …
Read More »नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट; नागोठण्यातील श्री जोगेश्वरी माता मंदिरात नियमांचे पालन
नागोठणे : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज, व्याघ्रेश्वर मंदिरातील नवरात्र उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शासनाचे सर्व नियम पाळूनच मंदिरात नवरात्र साजरा करण्यात येत असल्याचे उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष विनायक गोळे आणि पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. या उत्सवात दरवर्षी घेण्यात येणारे कीर्तन, …
Read More »‘शेतकर्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी’
माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. माणगाव तालुक्यातही भातपीक भिजून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य शासनाने तत्काळ थेट मदत द्यावी, अशी मागणी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली …
Read More »परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान; पंचनाम्याची प्रतीक्षा; सुधागडातील बळीराजा हवालदिल
पाली : रामप्रहर वृत्त परतीच्या वादळी पावसामुळे सुधागड तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार झालेले भाताचे पीक मातीमोल झाले, मात्र मागणी करूनही या नुकसानीचे अजूनही पंचनामे केले गेले नसल्याचा आरोप तालुक्यातील शेतकर्यांनी केला आहे. सुधागड तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करण्यात आली होती. समाधानकारक पाऊस झाल्याने …
Read More »गव्हाण ग्रामपंचायतीतर्फे बांधकामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण-कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथील टेरेसवर भिंत बांधण्यात येणार आहे. या बांधकामाचा मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 19) शुभारंभ करण्यात आला. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथील टेरेसवर ग्रामपंचायतीच्या …
Read More »पंचनामे न करता शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत करा : डॉ. अनिल बोंडे
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. 115 लाख हेक्टर शेतीचे सर्वेक्षण करायला सहा महिने लागतील. त्या ऐवजी राज्य सरकारने पंचनामे न करता आणि केंद्राकडे बोट न दाखवता शेतकर्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी कृषिमंत्री व किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »टोलवाटोलवी नको, शेतकर्यांना तातडीने मदत द्या!
देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी बारामती : प्रतिनिधीशेतकर्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारने शेतकर्यांना तातडीने मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करणारच आहे, पण केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली : प्रतिनिधी गडचिरोली येथील धानोरा अंतर्गत येणार्या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी (दि. 18) झालेच्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाच्या सी-60 जवानांना यश आले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जवानांनी नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केला असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही ताब्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper