Breaking News

Yearly Archives: 2021

एपीएमसीतील भाजी आता सर्कस मैदानात

पनवेल : प्रतिनिधी कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून उरण नाका परिसरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून हा भाजी बाजार खांदेश्वर स्टेशन रोडवरील सर्कस मैदानात शुक्रवारपासून सुरू झाला आहे. उरण नाका परिसरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी बाजारात मोठ्या …

Read More »

लोकल प्रवासासाठी प्रवाशांकडून विनवण्या

पनवेल : प्रतिनिधी ’ब्रेक द चेन’ अंतर्गत गुरुवारी रात्रीपासून नवीन नियमावली आलेल्याने पनवेल स्टेशनवर पोलिसांनी बंदोबस्त लावून लोकलने प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेत नसणार्याना स्टेशनमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण साहेब, मला लोकलने प्रवास करू द्या. मी मागच्यावेळी हेच पत्र दाखवून प्रवास केला होता, असे सांगत अनेक जण …

Read More »

बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना लवकरच बंदिस्त गाळे; आमदार मंदा म्हात्रे यांची अधिकार्यांसमवेत बैठक

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई केलेल्या बेलापूर ग्रामस्थ अधिकृत गाळेधारकांना व्यवसायाकरिता लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडून बंदिस्त गाळे मिळणार आहेत.  याबाबत नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता संजय देसाई, बेलापूर विभाग अधिकारी व सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल , कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांची बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांजसह …

Read More »

उरण नगर परिषद शाळेत आजपासून कोविड लसीकरण

उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी व नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या प्रयत्नाने शनिवार (दि. 24)पासून उरण नगर परिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा क्र. 1 व 2, पेन्शनर पार्क या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण सुरू होते. या ठिकाणी ओपीडी, अ‍ॅण्टीजन …

Read More »

‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

पनवेल : वार्ताहर कोरोना रोगावर प्रभावी ठरणार्‍या व संपूर्ण भारतामध्ये तुटवडा असणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनचा गैरमार्गाने काळ्याबाजारात हजारो रुपये किमतीत विक्री करणार्‍या रॅकेटचा मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉलच्या समोरील रोडवर एक व्यक्ती …

Read More »

महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची जोरदार टीका

मुंबई : प्रतिनिधी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचे प्राण गेल्यानंतर, आता विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भयनाक आगीच्या घटनेत 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या भयानक घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. विरारमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. …

Read More »

विषारी दृष्टिकोन

कोरोना विषाणूच्या महासाथीची दुसरी लाट अवघ्या देशाचे कंबरडे मोडते आहे आणि त्याच वेळेला काही राजकीय पुढार्‍यांना त्यातही राजकारण सूचते ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी पंतप्रधानांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन बैठकीच्या वेळी आले. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हात जोडून पंतप्रधानांकडे मदतीचा धावा केला. केजरीवाल यांचा हा …

Read More »

खालापुरात पाच लाखांचा गुटखा जप्त

खालापूर ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील माजगाव येथे एका किराणा स्टोअर्सवर धाड टाकून सुमारे पाच लाख किमतीचा गुटखा खालापूर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.माजगाव गावाच्या नाक्यावर असणार्‍या माही किराणा स्टोअर्समध्ये शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पान मसाला विक्रीसाठी आणला आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनकोन-सावळे रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी 14 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश पनवेल ः रामप्रहर वृत्तकोन-सावळे रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या विकासकामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 14 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल तालुक्यातील, परंतु उरण विधानसभा मतदारसंघात …

Read More »

जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी आता ई-पास आवश्यक

सतत बदलणार्‍या नियमांमुळे नागरिकांत संभ्रम मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. 13 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानंतर 22 एप्रिलपासून त्यामध्ये अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास गरजेचा असल्याचे महाराष्ट्र पोलीसच्या ट्विटर हॅण्डलवरून सांगण्यात आले आहे. दरम्यान, …

Read More »