Breaking News

महत्वाच्या बातम्या

चिंताजनक! कोरोना मृत्युदर वाढताच

अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होताना दिसत असली तरी मृत्युदर वाढतोच आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून वाढू लागलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्याच्या सुरुवातीस कमी होत असल्याने दिलासा मिळाला, मात्र मृत्युदर वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य …

Read More »

कोविड हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर कोविड सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलांना कोविड आयसीयु विभागात सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी क्रांतीज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली शिंदे यांनी निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे व प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे. या निवेदनात रुपाली शिंदे यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे रुग्णांसाठी बेड, …

Read More »

लोकमान्य सोसायटीतर्फे दोन नवीन योजना सुरू

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड 19सहित) लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना सुरू करत आहे. या योजनेमध्ये सुरक्षा समृद्धी व सुरक्षा समृद्धी अ‍ॅडवांटेज या दोन प्रकारांचा समावेश आहे. ही मुदत ठेव योजना एक वर्षाची मुदत ठेव योजना असून 8.50 टक्के व्याज दराने उपलब्ध आहे. …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांना सुरुवात

पनवेल : प्रतिनिधी कोरोनाशी लढा सुरू असतानाच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळा पुर्व कामांना सुरूवात झाली असून जवळपास 50 टक्के काम पुर्ण होत आले आहे. प्रभाग अ, ब, क, डमधील नाले साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. एका बाजूला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पनवेल महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तर दुसर्‍या …

Read More »

कोरोनाची तिसरी लाट अटळ; वैद्यकीय सल्लागारांचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढताहेत. त्यासोबतच मृतांचा आकडादेखील सातत्याने 3500च्या वर आहे. त्यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यापासून बचावासाठी देशातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करण्याची गरजही त्यांनी या वेळी अधोरेखित केली …

Read More »

मराठा आरक्षण प्रकरण : ठाकरे सरकारने पळ काढू नये; भाजप नेते आमदार आशिष शेलारांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे वकिल कोर्टात वेळेत पोहचले नाहीत, मराठा समाजाच्या लोकांशी व संघटनांशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. वकिलांच्या बैठका घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या विषयातून ठाकरे सरकारला पळ काढता येणार नाही, असा टोला भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी (दि. 5) घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला. …

Read More »

खोपोलीत निषेध आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा खोपोलीतील कार्यकर्त्यांनी बुधवारी हातात फलक घेवून आपल्या घराबाहेर निषेध केला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर   तृणमूल काँग्रेसचे गुंड भाजप कार्यकर्त्यांवर खुनी हल्ले करीत आहेत. या हल्ल्याचा तसेच याबाबत मूग गिळून गुपचूप बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करण्याचे आवाहन भाजपचे …

Read More »

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध

अलिबाग : प्रतिनिधी पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा बुधवारी (दि. 5) अलिबागमध्ये भाजपतर्फे निषेध करण्यात आला. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. विधासभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल राज्यामध्ये  हिंसाचार सुरु झाला आहे. या हिंसाचारात भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले …

Read More »

खारघरमध्ये कोविड रुग्णालयांची संख्या वाढवा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघरमधील कोविडबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड उपचार रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खारघरमध्ये कोविड उपचारासाठी रुग्णालयांची वाढ करण्यासंदर्भात नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृह नेते …

Read More »

…म्हणून आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला ः फडणवीस

नागपूर ः प्रतिनिधीमराठा समाजाला दिलेले आरक्षण जर टिकले असते, तर त्याचे सर्व श्रेय भाजपला मिळाले असते. म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.विषयाची संवेदनशीलता पाहता आतापर्यंत मी राजकीय न बोलण्याचे ठरविले होते, मात्र अशोक चव्हाण, नवाब मलिक हे ज्या पद्धतीने …

Read More »