Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडात नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग

अलिबाग ः प्रतिनिधीजानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणार्‍या नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, व पोलादपूर या नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे तेथील राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रशासनही सज्ज होत …

Read More »

माथेरानची माहिती आता एका क्लिकवर!

पर्यटनविषयक अ‍ॅप लवकरच होणार लाँच कर्जत ः बातमीदारमाथेरानमध्ये येणार्‍या पर्यटकांच्या माहितीकरिता एक अ‍ॅप तयार करण्यात येत असून, याच महिन्यात त्याचे लाँचिंग केले जाणार आहे. माथेरान गिरीस्थान नगर परिषद आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ यांच्या माध्यमातून बहुपर्यायी अशा या अ‍ॅपची निर्मिती केली जात आहे.निसर्गरम्य प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घालते. …

Read More »

टीम इंडियाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या वन डेत विजय कॅनबेरा : कर्णधार विराट कोहलीसह अष्टपैलू हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांची अर्धशतके आणि शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या वन-डे सामन्यात बाजी मारली. अंतिम सामन्यात 13 धावांनी विजय साकारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. ऑस्ट्रेलियाकडून …

Read More »

‘जलयुक्त शिवार’ची चौकशी सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने : राम शिंदे

पुणे ः प्रतिनिधीदेवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनाने (ईडी) धाडसत्र आणि चौकशी सुरू केल्यामुळे राज्य सरकारने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. यावर भाजपचे माजी …

Read More »

यूपीत नवी फिल्मसिटी उभारणार : सीएम योगी

मुंबई : प्रतिनिधीउत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचे काम आम्ही करीत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधीकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिल, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आदित्यनाथ यांनी शिवसेनेकडून झालेल्या टीकेवर बोलताना स्पष्ट …

Read More »

येमेनमध्ये फसलेल्या 14 भारतीयांसाठी जीएमबीएफ ठरले देवदूत

अलिबाग : प्रतिनिधी आखाती देशात नोकरी किंवा व्यावसायिक म्हणून स्थायिक झालेल्या भारतीयांना डॉ. सुनील मांजरेकर अध्यक्ष असलेल्या जीएमबीएफ फोरम या संघटनेचा फार मोठा आधार  आहे. याची प्रचिती सौदी अरेबियात येमान मध्ये फसलेल्या 14 भारतीयांना आली. तब्बल 10 महिन्यानंतर या 14 जणांची जीएमबीएफ फोरमचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर, चंद्रशेखर भाटिया, समाजसेविका …

Read More »

माणगावमधील शेतकरी मदतीपासून वंचित

माणगाव ः प्रतिनिधीमुरूडप्रमाणेच माणगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांनाही राज्य सरकारकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होऊन तब्बल दोन महिने लोटले तरीही मदत मिळाली नसल्याने बाधीत शेतकरी हवालदिल झाले आहेत.माणगाव तालुक्यातील 2162.71 हेक्टर क्षेत्रामधील पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या 8343 शेतकर्‍यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह …

Read More »

हुतात्मा भाई कोतवाल यांना माथेरानमध्ये अभिवादन

कर्जत : बातमीदार वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची 108 वी जयंती  मंगळवारी (दि. 1) माथेरानमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी माथेरानकरांनी हुतात्मास्मारक येथून सकाळी मशाल फेरी काढली होती. त्यांच्या जन्मस्थळी हुतात्मा भाई कोतवाल विचारमंच तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम हाती घेण्यात आला …

Read More »

खालापुरात अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार

आरोपीला तात्काळ अटक करावे; आदिवासी संघटनेची मागणी खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील कुंभिवली आदिवासी वाडीतील एका  अल्पवयीन आदिवासी मुलीवर अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी  खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीना तात्काळ अटक करावी, अशा मागणी आदिवासी संघटनेने खालापूर …

Read More »

रायगडात जेमतेम सात केंद्रांवर हमीभावाने भातखरेदी

शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात या वर्षीच्या हंगामात 35 हमीभाव भात खरेदी केंद्रांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. भाताच्या मळण्यांची कामे वेगात सुरू असली तरी आतापर्यंत जेमतेम सात केंद्रांवरच प्रत्यक्ष भातखरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. व्यापारी पडत्या दराने भाताची खरेदी करीत असल्याने शेतकर्‍यांना …

Read More »