Breaking News

महत्वाच्या बातम्या

स्टार फाउंडेशनकडून मिठाई वाटप

मुरुड : प्रतिनिधी नगर परिषदेचे सुमारे 46 सफाई कर्मचारी दररोज मुरुड शहरात साफसफाईचे काम करतात. स्टार फाउंडेशनच्या वतीने या कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त शनिवारी (दि. 14) मिठाईचे बॉक्स आणि स्टीलच्या ताटांचे वाटप करण्यात आले. स्टार फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष जाहिद फकजी,  जिल्हा अध्यक्ष अंकीत गुरव, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय करडे, फाउंडेशनचे तालुका …

Read More »

अलिबागच्या गोशाळेत गायवासरांची पूजा

अलिबाग : प्रतिनिधी वसुबारस या दिवशी गायींसह वासरांची पूजा केली जाते. अलिबागजवळच्या  खानाव इथल्या सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या गोशाळेत गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. यानिमित्ताने संस्थेचे देणगीदार राजेश प्रधान यांच्या हस्ते सपत्नीक मंत्रोच्चारात गणेशपूजन, होमहवन करण्यात आले. गोशाळेतील दोन गर्भवती गायींचा ओटी भरण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी पार पडला. गाय …

Read More »

कर्जतच्या फार्मसी महाविद्यालयाचा आयर्लंडच्या एआयटीबरोबर सामंजस्य करार

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालय (कर्जत)आणि आयर्लंडमधील अ‍ॅथलोन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. झूम मिटींग या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर स्वाक्षरी समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाची सुरूवात दोन्ही संस्थांच्या परिचयानंतर झाली. यावेळी राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ. मोहन काळे, सहाय्यक प्राध्यापिका …

Read More »

बोर्लीच्या थेट सरपंचाविरोधात ग्रामसभेतही अविश्वास ठराव मंजूर

रेवदंडा : प्रतिनिधी ग्रामपंचायतीमध्ये मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाला ग्रामसभेत ग्रामस्थांनीही संमती दर्शविल्याने शिवसेनेचे  नौशाद दळवी यांना बोर्लीच्या थेट सरपंच पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट सरपंचपदी नौशाद दळवी निवडून आले होते. मात्र उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दळवी  यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला होता. शासनाच्या …

Read More »

आदिवासी सेवा संघातर्फे धान्यवाटप

कर्जत : बातमीदार आदिवासी सेवा संघाच्या वतीने कर्जत तालुक्यातील एकनाथवाडीमधील सर्व आदिवासी कुटुंबांना दिवाळी निमित्त मिठाई तसेच विधवा व निराधार महिलांना धान्य आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा कोरोनायोध्दा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आदिवासी सेवा संघांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत …

Read More »

दिवाळी झाली गोड

विहिंपतर्फे आदिवासींना फराळ मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील टक्याचीवाडी येथील सुमारे 50 आदिवासी कुटुंबियांना विश्व हिंदू परिषदेतर्फे शनिवारी (दि. 14) दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. विहिंपतर्फे हा उपक्रम यंदा सलग चौथ्या वर्षीही राबविण्यात आला. मुरुडपासून सुमारे दोन कि.मी. अंतरावरील डोंगरावर वसलेल्या टक्याचीवाडी येथे दिवाळीच्या दिवशी जावून  विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तेथील …

Read More »

सीकेटीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश

पनवेल : रामप्रहर वृत्त – उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सन 2020 मध्येही चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाने शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागात शिकणाया इयत्ता पाचवीच्या पाच विद्यार्थ्यांना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (झणझड) तसेच इयत्ता आठवीच्या नऊ  विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (झडड) शिष्यवृत्ती संपादित …

Read More »

दिवाळी ते दिवाळी-तळातून उभारीने दिली संधी!

दिवाळी ते दिवाळी या एका वर्षात निफ्टीनं 10 टक्के वाढ नोंदवलीय (11627-12680) तर सेन्सेक्सनं 10.68 टक्के. ही वाढ भव्यदिव्य वाटत नसली तरी मार्च महिन्यामध्ये तळात गेलेल्या बाजारानं मिळवलेली उभारी लक्षणीय ठरली आहे. दरवर्षी उत्साहानं साजरा केला जाणारा दिव्यांचा सण म्हणजे दीपावली. कोरोना संकटात दिवाळी कशी जाणार, अशी शंका व्यक्त केली …

Read More »

निवडणूक निकालांमागे आर्थिक बदलांचा मोठा वाटा का आहे?

निवडणूक निकालांचे विश्लेषण आजही पारंपारिक आणि जुनाट जातीधर्माच्या गणितावर केले जाते. वास्तविक बहुजनांमध्ये भौतिक सुखाच्या ज्या आकांक्षा तयार झाल्या आहेत, त्याला आधार देणारे आर्थिक बदल जनमतांत मोठी भूमिका बजावू लागले आहे. त्याची प्रचिती 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांत आली होती आणि ताज्या विधानसभा निवडणुकांतही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. बिहारमधील विधानसभा आणि इतर …

Read More »

दुरितांचे तिमिर जावो

वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनामुळे होऊ पाहणारी महाप्रचंड जीवितहानी टाळण्यात यश मिळाले हे खरे असले तरी या जालिम उपायाचे परिणाम काही काळ भोगावे लागणार आहेत. तरीही पंतप्रधान मोदी यांनी देशाचे अर्थचक्र पूर्णत: ठप्प होऊ दिले नाही. याच काळात त्यांनी आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ रोवली. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कित्येक गरजूंना उद्योग व्यवसायासाठी कर्जवाटप …

Read More »