नवी मुंबई : बातमीदार सानपाडा नोडमधील समाजसेवक पांडुरंग आमले यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेली काही वर्षे सामाजिक कार्यातून जनसामान्यांत भाजपसाठी काम करणार्या पांडुरंग आमले यांच्या कार्याची भाजपकडून दखल घेण्यात आली असून त्यांची पोचपावती त्यांनी भाजयुमोच्या माध्यमातून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. …
Read More »धोकादायक विद्युत डीपीबाबत माजी नगरसेेविका दर्शना भोईर यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील उरण नाका येथील रस्त्यावर असलेली विद्युत डीपी धोकादायक परिस्थितीत असून नादुरुस्त झाली आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी अभियंता मोरे यांच्याशी संपर्क साधला आहे. लवकरच डीपीची दुरुस्ती करू, असे मोरे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या टपालनाका येथील कार्यालयाकडून विद्युत पुरवठा …
Read More »नवी मुंबईची ‘शून्य प्लास्टिक’कडे वाटचाल
5146 विद्यार्थ्यांनी जमा केले 962 किलो प्लास्टिक नवी मुंबई : बातमीदार ‘शून्य कचर्याचा प्रारंभ माझ्यापासून’ या नवी मुंबईतील शाळा-शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत 32 शाळांतील 5,146 विद्यार्थ्यांनी 8,720 प्लास्टिक बाटल्यांमध्ये तब्बल 961 किलोहून अधिक वजनाच्या तुकड्यांच्या स्वरुपातील प्लास्टिक संकलीत केले. या उपक्रमामध्ये सर्वोत्तम …
Read More »विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी -लोकनेते रामशेठ ठाकूर
शालेय विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शूज व सॉक्सचे वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी व आपले जीवन यशस्वी करावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 24) केले. ‘रयत’चे गव्हाण कोपर …
Read More »ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित -आमदार गणेश नाईक
नवी मुंबई : बातमीदार शिक्षकांच्या व्यथा जाणून घेत त्या सोडविण्यासाठी सातत्याने काम करणारे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित आहे. शिक्षकांसाठी शिक्षकच उमेदवार हा आमदार झाला पाहिजे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिक्षक असल्याने त्यांचा विजय आता केवळ …
Read More »कळंबोलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहासाठी सरकारकडून पाच कोटींचा निधी मंजूर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीत पनवेल महापालिकेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने भव्यदिव्य सभागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत अध्यादेशसुद्धा काढण्यात आला आहे. कळंबोली सेक्टर 11 येथे उभारण्यात येणार्या या वास्तूचा संकल्पीय आराखडा …
Read More »हुकुमाचा पत्ता
अडीच वर्षे सत्तेत असतानादेखील शिवसेनेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्याचे सुचले नाही. मुख्यमंत्रीपद हाताशी असूनदेखील केवळ ‘असंगाशी संग’ केल्यामुळे साधे तैलचित्र लावणे हीदेखील अवघड बाब बनून गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नावच मुळी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे आहे. त्यांच्या कार्यकाळात आधीच्या सरकारने केलेली चूक सुधारली गेली याबद्दल त्यांचे …
Read More »रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती
अलिबाग : रायगड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. योगेश म्हसे हे म्हाडाचे कार्याधिकारी म्हणून कार्यरत होते, तसेच मार्केटिंगचे महाव्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. आताचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर …
Read More »परदेशी रानमोडीचा उपद्रव वाढला
जैवविविधता धोक्यात, निसर्ग अभ्यासकांची चिंता वाढली पाली : प्रतिनिधी पाली सुधागड़सह रायगड जिल्ह्यातील कोणत्याही डोंगरमाथ्यावर, माळरानावर, रस्त्याच्या कडेला अथवा शहर आणि गावातही बारीक पांढर्या फुलांनी भरलेली दाट हिरवी झुडपे पाहायला मिळतात. रानमोडी म्हणून परिचित असलेली ही वनस्पती तिच्या नावाप्रमाणे रानमोडत आहे. झपाट्याने वाढणारी ही परदेशी वनस्पती पूर्णतः निरोपयोगी असून अन्य …
Read More »गारमाळचा रस्ता निधीअभावी रखडला; निधीची प्रतिक्षा : ग्रामस्थांचे हाल सुरुच
खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील छत्तीशी भागातील गारमाळ येथील ग्रामस्थ पक्का रस्त्याच्या प्रतीक्षेत असून रस्त्याला अजूनही निधीची प्रतिक्षा आहे. नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीत गारमाळ गाव असून मुख्य रस्त्यापासून सुमारे अडीच किलोमीटर रस्त्याचे अंतर आहे. गारमाळ धनगरवाडा आणि आदिवासी बांधव आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत यामुळे येथील ग्रामस्थांना अडीच किमीची पायपीट करावी लागत आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper