Breaking News

Ramprahar News Team

पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिर

माजी खासदार संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती नवी मुंबई : बातमीदार जीवन विद्या मशीन आणि एम्बिशन ट्युटोरिअल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा’ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी पालक यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमास ठाण्याचे माजी खा. संजीव नाईक साहेब प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

ऐरोलीत बाजार संकुलाची इमारत बनलीय धोकादायक

नवी मुंबई : बातमीदार ऐरोली सेक्टर 15मध्ये सिडकोकडून बांधण्यात आलेले बाजार संकुल आता वापरात नाही. त्यामुळे बाजार संकुलाची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीत मोठ्या प्रमाणावर गर्दुल्ले, मद्यपी यांचे उद्योग सुरू आहेत. ही इमारत जीर्ण झाल्यामुळे पडून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वापरात नसलेला या बाजार संकुलाचा भूखंड नवी मुंबई महापालिकेकडे …

Read More »

शहर विद्रुपीकरण करणार्‍यांवर बडगा

नवी मुंबईत विनापरवाना बॅनरबाजीवर होणार कारवाई नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये विनापरवानगी बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज लावून व भिंती रंगवून जाहिराती करण्यात येतात. त्यांच्यावर बडगा उगारण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीत विद्रुपीकरण करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांचे दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. सदनिकांची विक्री, …

Read More »

उकरूळ गावात कृषी संजीवनी सप्ताह; शेतकर्‍यांचा प्रतिसाद

कर्जत : बातमीदार एसआरटी, चारसूत्री लागवड पद्धत तसेच ड्रमसिडरसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकर्‍यांनी भात पिकाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी उकरूळ येथे केले.  कृषी संजीवनी सप्ताहाचे निमिताने कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायत आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील मंदिरात शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिर …

Read More »

कर्जतमध्ये असंघटित कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कर्जत : बातमीदार राजर्षी शाहू महाराज जयंती दिनानिमित्त आधार असंघटीत जनरल कामगार युनियनच्या वतीने रविवारी (दि. 26) कर्जतमधील रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नामवंत डॉक्टरांनी असंघटित कामगारांची आरोग्य तपासणी केली. राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून आधार असंघटीत जनरल कामगार …

Read More »

पोलादपुरातील रानबाजिरे धरणाची साठवण क्षमता वाढण्यासाठी बॅकवॉटर केले टप्प्याटप्प्याने रिकामे

वाळू वाहून गेल्याने अवैध उपसा करणार्‍यांची धांदल पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील रानबाजिरे धरण गेल्या वर्षी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले होते. या पार्श्वभूमीवर हे धरण उशिराने भरावे, यासाठी गेल्या महिन्यापासून धरणातील पाणी सावित्रीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील  वाळू वाहून गेल्याने अवैध वाळू उपसा करणार्‍यांची धांदल उडाल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर …

Read More »

जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून 10 गावांचा कायापालट करणार -आनंद राणे

कर्जत : प्रतिनिधी जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येत्या तीन वर्षात राज्यातील दहा गावांचा कायापालट करण्यात येईल, अशी ग्वाही जीवनविद्या मिशनचे विश्वस्त आनंद राणे यांनी भिवपुरी (ता. कर्जत) येथे दिली. कर्जत तालुक्यातील वैजनाथ परिसरात असलेल्या सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनच्या वतीने भिवपुरी गावामध्ये ग्रामसमृध्दी अभियान राबविण्यात येणार आहे. …

Read More »

वाकण-खोपोली मार्गावरील पुलांचे काम अपुर्णावस्थेत

पावसाळ्यात यंदाही वाहणार पाली पुलावरून पाणी पाली : प्रतिनिधी वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावर जांभूळपाडा, भालगूल व पाली येथील नदीवरील पुलांची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पालीतील अंबा नदी पुलावरून पाणी जाऊन वाहतूक खोळंबणार आहे. पावसाळ्यापूर्वी येथील पाली अंबा नदीवरील पुलाच्या एका मार्गिकेचे कामे पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे …

Read More »

म्हसळ्यात भरवस्तीत आले भेकर

वनविभागाच्या सर्तकतेने जखमी भेकराला मिळाले जीवदान म्हसळा : प्रतिनिधी शहरातील भरवस्तीमधील दुकानाच्या बंद शटरला संध्याकाळच्या सुमारास एका भेकराने जोरदार धडक जोरदार धडक दिल्याने ते जखमी झाले. त्याचे वृत्त समजताच म्हसळयाचे वनपाल तत्काळ घटनास्थळी पोहचले त्यांनी पशुधन पर्यवेक्षकांच्या माध्यमातून उपचार करून जखमी भेकराला जिवदान दिले. म्हसळा तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र फार मोठे …

Read More »

रायगडातील चार घाट धोकादायक; पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास

महाड ः रामप्रहर वृत्त वर्दळीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले रायगड जिल्ह्यातील कशेडी, ताम्हिणी, वरंध-वाघजाई व आंबेनळी घाट सातत्याने धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून या घाटातून प्रवास करावा लागतो. सतत कोसळणार्‍या दरडी व भूस्खलनामुळे घाटात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारही वारंवार होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट, माणगाव-पुणे …

Read More »