मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 20) मतदान होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने राज्यसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. भाजपचे पाच, तर आघाडीचे सहा (शिवसेेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन) उमेदवार मैदानात आहेत. विधान परिषदेसाठी …
Read More »युईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल 99.46 टक्के
उरण : वार्ताहर या वर्षी जाहीर झालेल्या 10वी च्या निकालात यु. ई .एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 99.46 टक्के निकाल लागला असून कनिष्का गिरीष पाटील हिने 94.80 टक्के मिळवून प्रथम क्रमांक, यश जितेंद्र म्हात्रे, गायत्री रविंद्र घोलप आणि शिवांगी नानासाहेब डांगे या तिघांनीही 93 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. संस्कृती नरेंद्र …
Read More »महावितरणच्या नेरूळ विभागात देखभाल-दुरुस्तीची कामे वेगात
मुंबई : बातमीदार पावसाळा आला की सर्व शासकीय यंत्रणांना दुप्पट गतीने कामे करावी लागतात. सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या अखत्यारीतील विविध घटकांवर विशेष लक्ष द्यावे लागते. महावितरणची यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे, महावितरणच्या कर्मचारी व अधिकार्यांना सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी देखभाल व दुरुस्तीची कामे आहेत. जर …
Read More »‘रानसई’चा पाणीसाठा संपुष्टात; डेडस्टॉकमधून करावा लागणार पाणीपुरवठा
उरण : प्रतिनिधी उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे धरणात आता 15 दिवस पुरेल इतकाच पाण्याचा साठा उरला आहे. त्यामुळे याआधीच पाणी टंचाईची झळ सोसणार्या दिड लाख संख्येच्या उरणकरांना गुरुवारी रात्रीपासूनच धरणातील डेड स्टॉकमधून पाणीपुरवठा करण्याची वेळ एमआयडीसीवर येऊन ठेपली आहे. दिड लाख लोकसंख्येच्या …
Read More »आगीशी खेळ
केवळ गैरसमजापायी एखाद्या चांगल्या योजनेचा बट्याबोळ कसा होतो याची उदाहरणे आपल्या देशात कमी अथवा नवीन नाहीत. एखाद्या योजनेचा हेतू चांगला असला तरी अंमलबजावणी मात्र वादग्रस्त ठरते. शेतकर्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने केलेले कायदे काही जणांच्या पचनी पडले नाहीत. त्यामुळे उभ्या राहिलेल्या लोकक्षोभापायी शेतकर्यांचे कल्याण करणारी एक चांगली योजना केंद्र सरकारला गुंडाळावी …
Read More »जिल्ह्यातील 77 तलावांचे होणार संवर्धन
सामाजिक संस्था, बचत गट, नागरिकांना सहभागासाठी आवाहन अलिबाग : प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यांचे जतन करण्यासाठी सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील 77 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जिवित करणे अशी कामे हाती घेण्यात येणार …
Read More »…अन् विद्यार्थी भारावले! कर्जत विद्या विकास मंदिर विद्यालयात दोन वर्षांनी भरली शाळा
कर्जत : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात ऑनलाईन शाळा होती. शासन आदेशानुसार आज पहिल्यांदाच बहुतांश विद्यार्थी शाळेत आले. पहिलाच दिवस असल्याने अनेक शाळांमध्ये सजावट करण्यात आली होती. कर्जत शहरातील महिला मंडळ संचलित विद्या विकास मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवसाच्या शाळा प्रवेशोत्सवाची आगळी वेगळी तयारी केली होती. पालक हे विद्यार्थ्यांना घेऊन उत्स्फूर्तपणे आले …
Read More »माथेरान नागरी पतसंस्था निवडणुकीसाठी भाजप सज्ज; सर्व जागांवर उमेदवारी
कर्जत : बातमीदार माथेरान येथील माथेरान नागरी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या वतीने माथेरान पतसंस्थेवर भाजपचे कमळ फुलविण्यासाठी जोरदार तयारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, माथेरान शाखा पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक भाजप ग्रामदैवत पिसारनाथ पॅनल म्हणून लढविणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून सर्व जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत. …
Read More »अंगणवाडी कर्मचार्यांचा जि.प.वर मोर्चा
विविध मागण्यांसाठी साकडे; घोषणांनी परिसर दणाणला अलिबाग : प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचार्यांना कायम शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, त्यांचे मानधन वाढविण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे रायगड जिल्हा परिषदेवर बुधवारी (दि. 15 ) मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचार्यांचा मोर्चा अलिबाग मुख्य टपाल कार्यालयाजवळ आला असता पोलिसांनी मोर्चा तो …
Read More »प्राधान्य कशाला हवे?
जमेल त्या मार्गाने सत्ता मिळवणे सोपे असते. सतराशे-साठ उठाठेवी करून ती काही काळ टिकवतादेखील येते. परंतु रयतेच्या भल्यासाठी सत्ता राबवणे हे मात्र येरागबाळ्याचे काम नोव्हे, याचे प्रत्यंतर बुधवारच्या दिवसभरात महाराष्ट्राच्या जनतेला आलेच असेल. पाण्यावाचून तडफडणार्या जालन्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे प्रचंड जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्याचवेळी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper