Breaking News

Ramprahar News Team

मासेमारी नौका अद्यापही बंदरातच; मच्छीमारांचा नव्या हंगामाचा मुहूर्त लांबला

अलिबाग : प्रतिनिधी मच्छीमारांसमोरील विघ्ने काही संपण्याचे नाव घेत नाहीत. नव्या हंगामाची सुरुवात करण्यास सरसावलेल्या रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना वादळी हवामानाचा जबर तडाखा बसला आहे. 20 ऑगस्टपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा बंदर विभागाने दिला आहे. यामुळे मासेमारीवरील दोन महिन्यांचा शासकीय बंदी कालावधी संपून अर्धा महिना उलटला तरी मासेमारी नौका …

Read More »

एमएसएमई क्षेत्रात पाच कोटी नवे रोजगार निर्माण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णपणे थांबले होते. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू होताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आपल्या देशात एमएसएमई क्षेत्राचे मोठे योगदान आहे. येत्या काळात या क्षेत्रात पाच कोटी नवे रोजगार निर्माण …

Read More »

भाजप किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी परशुराम म्हसे

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी कर्जत तालुका मंडल कार्यालयीन प्रमुख आणि प्रगतशील शेतकरी परशुराम म्हसे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते म्हसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्यावर तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे. कर्जत तालुक्यातील खैरपाडा …

Read More »

राज्यपालांनी 79व्या वर्षी केला शिवनेरी सर

जुन्नर : प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या 79व्या वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. ते सामान्य व्यक्तिमत्त्व नव्हते, तर अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय …

Read More »

रिलायन्स पाइपलाइनबाधित प्रकल्पग्रस्त करणार उपोषण; भाजपचा पाठिंबा

कर्जत : बातमीदार रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइन प्रकल्पापोटी कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांना त्यांनी दिलेल्या जागेचा मोबदला मिळालेला नाही. तो मिळावा यासाठी रिलायन्स कंपनी आणि प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता, पण त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने या प्रकल्पग्रस्तांनी येत्या बुधवारी (दि. 19) कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. …

Read More »

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने खारघर टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांना मिळाला न्याय

खारघर : प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असताना सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या 39 कर्मचार्‍यांना एप्रिल महिन्यापासून कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले होते. टोल कंत्राटदाराच्या या भूमिकेमुळे कामगारांनी आंदोलनाचा पर्याय निवडला होता, परंतु या आंदोलनापूर्वी झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने पहिल्या टप्प्यात 17 कामगारांना कामावर …

Read More »

तांबडी घटनेप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा! अन्यथा अधिवेशन काळात मोर्चा काढणार; मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा

रोहे : प्रतिनिधी मराठा समाजाच्या समन्वयकांनी रविवारी (दि. 16) रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अत्याचारात बळी गेलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची दुसर्‍यांदा भेट घेत सांत्वन केले. या वेळी त्यांनी या घटनेत न्याय मिळवून देण्यासाठी समस्त मराठा समाज एकवटला आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी; अन्यथा येत्या अधिवेशन काळात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा …

Read More »

रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 329 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 16) 15 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 329 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे 304 रुग्ण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये कर्जत तालुक्यातील चार, पनवेल तीन, रोहा व अलिबाग प्रत्येकी दोन आणि उरण, खालापूर, पेण व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर …

Read More »

मूर्तीमंत कलेचे माहेरघर चिरनेर येथील कलानगर

चिरनेर : रामप्रहर वृत्त अवघ्या महाराष्ट्रातील आणि हिंदू धर्मियांचा सर्वाधिक लोकप्रिय भावभक्तीच्या श्रध्देचा आणि जिव्हाळयाचा असा गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. गणेशोत्सवही मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेसमाज माध्यमांवर येणार्‍या नवनविन आणि विविध पध्दतीच्या गणेशमुर्ती पाहून प्रत्येक कारखान्यात विविध रूपातील मुर्ती साकारण्यात आल्या आहेत. …

Read More »

गणरायाचे आठ दिवस आधीच घरी आगमन; गर्दी टाळण्यासाठी नागरिकांचा निर्णय

पनवेल : बातमीदार कोरोनाकाळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणण्याबरोबरच तिचे गृहसंकुलाशेजारी विसर्जन करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. याच वेळी गणरायाच्या आगमनादिवशी वा त्याआधी मूर्तीकारांच्या कार्यशाळेत गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांनी एक आठवडा आधीच मूर्ती घरी आणण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी  …

Read More »