महाड : प्रतिनिधी महाड औद्योगिक क्षेत्रातील एमएमए कोविड सेंटर अद्ययावत करा, पण त्याचबरोबर शहरातील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी भाजपने मंगळवारी (दि. 18) पत्रकार परिषदेत केली. उपचार होऊ न शकल्याने अशोक सावंत यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी या वेळी …
Read More »कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी भाजप आक्रमक; धाटाव एमआयडीसीतील एलपी कंपनीच्या गेटवर आज मोर्चा
रोहा, धाटाव : प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार व व्यवस्थापन समितीकडून कामगारांना कामावरून तडकाफडकी काढून टाकणे, कोरोना काळात त्रास देणे यांसह होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात भाजप बुधवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता एल. पी. कंपनीच्या गेटसमोर प्रतीकात्मक आंदोलन करणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करणार …
Read More »देशात कोरोना चाचण्यांचा विक्रम; एका दिवसात तब्बल नऊ लाख 99 हजार 864 टेस्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात दररोज 50 ते 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढल्याचे समोर आले आहे. देशात सध्या तीन कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत. भारताने एका दिवसात नऊ लाख 99 हजार 864 कोरोना चाचण्या …
Read More »रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 359 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढत चालली असून, 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 18) झाली, तर 359 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 389 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, उरण तीन, श्रीवर्धन दोन आणि खालापूर व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर …
Read More »‘अंजुमन’च्या प्राचार्यपदी इश्तियाक घलटे
मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमधील अंजुमन इस्लाम जंजिरा आयटीआय तांत्रिक शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यपदी इश्तियाक घलटे यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन उत्कर्ष साधण्यासाठी अंजुमन संस्थेचा मोठा वाटा असून रायगडात संस्थेचा नावलौकिक आहे. इश्तियाक घलटे 1992मध्ये निर्देशक पदावर रुजू झाले. 2013मध्ये त्यांना संस्थेकडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राचार्यपदी …
Read More »गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पेण ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना मदतीचा हात देत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने पेण तालुक्यासह …
Read More »आदिवासी बांधवांना मदतीचा हात
रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील वेलटवाडी आदिवासीवाडी सामाजिक कार्य म्हणून दत्तक घेतलेल्या ऑल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्थेच्या वतीने येथील आदिवासी बांधवांना गॅस शेगडी व खानाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम खानाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी भूषविले. या वेळी ऑल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्थेचे अध्यक्ष …
Read More »गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांचे गावांकडे आगमन
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही, परंतु प्रत्येक घरात गणपती विराजमान होतो. मुरूड पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 25 हजार दीड, पाच व 10 दिवसांच्या गणपतींची संख्या आहे. बाहेरगावी कामासाठी स्थायिक झालेले भाऊ, काका, मामा यांचा सर्व परिवार खासकरून गणेशोत्सवासाठी येत असतो. त्यामुळे मुरूड तालुक्यात नेहमीपेक्षा …
Read More »आसल ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? चढ्या दराने वस्तूंची खरेदी; कोकण आयुक्तांकडे तक्रार
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीत थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामनिधी आणि 14व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या अन्य सहा सदस्यांनी केला आहे. या सहा सदस्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे याबाबतची तक्रार केली आहे.दरम्यान, पिण्याच्या पाण्याचे जलशुद्धिकरण संच, ई-लर्निंग संच, शैक्षणिक साहित्य, शाळांचे …
Read More »रत्नागिरीत अतिवृष्टी; महामार्गावरील वाहतूक बंद
चिपळूण : प्रतिनिधी जोरदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर येऊन हे पाणी थेट शहरात शिरले. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रात्रभर कोसळणारा पाऊस व कोयना धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात घुसले आणि बाजारपेठ पाण्याखाली गेली. पाणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper